महाराष्ट्र भूषण : 14 श्री सदस्यांचे मृत्यू चेंगराचेंगरीमुळे? Video ने शिंदेंच्या वाढवल्या अडचणी
महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरुन सुरु झालेला वाद अद्याप कायम आहे. या पुरस्कार सोहळ्यादरम्यान, मृत्यूमुखी पडलेल्या श्रीसदस्यांची संख्या आता 14 पर्यंत पोहचली आहे.
ADVERTISEMENT

Maharashtra Bhushan award controversy :
मुंबई : महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरुन सुरु झालेला वाद अद्याप कायम आहे. या पुरस्कार सोहळ्यादरम्यान, मृत्यूमुखी पडलेल्या श्रीसदस्यांची संख्या आता 14 पर्यंत पोहचली आहे. 14 जणांचा मृत्यूचं कारण उष्माघात सांगण्यात आलं आहे. मात्र हे मृत्यू उष्माघाताने नाही तर चेंगरुन झाले असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावरुन व्हायरल होऊ लागला असून महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. तसंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्वरीत राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही केली आहे. (viral video added to the problems of the Shinde government in the Maharashtra Bhushan award controversy)
नेमकं काय आहे व्हिडीओमध्ये?
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हा व्हायरल व्हिडीओ ट्विट केला आहे. यावर ते म्हणाले, महाराष्ट्र भूषण पुरस्कारावेळी झालेले मृत्यू हे चेंगराचेंगरीमुळे? खोके सरकार नक्की काय लपवतंय? या सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्वरीत राजीनामा दिला पाहिजे. मी राज्यपाल रमेश बैस यांना हे सरकार बरखास्त करण्याची विनंती करतो.
महाराष्ट्र भूषण पुरस्कारावेळी झालेले मृत्यू हे चेंगराचेंगरीमूळे? खोके सरकार नक्की काय लपवतंय?
या सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्वरीत राजीनामा दिला पाहिजे. मी राज्यपाल रमेश बैस यांना हे सरकार बरखास्त करण्याची विनंती करतो. pic.twitter.com/KP1jxrKVFW— Nana Patole (@NANA_PATOLE) April 19, 2023










