शिंदे गटाला मनसेमध्ये सामील करुन घेणार? राज ठाकरेंनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मुंबई तक

मुंबई: एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) आपल्यासोबत शिवसेनेच्या ४० आमदारांना सोबत घेऊन बंड केले. अगोदर सुरत नंतर गुवाहटी असा प्रवास करुन ते १२ दिवसानंतर महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रात विशेष अधिवेशन होऊन नवीन सरकार स्थापन झाले. या संपूर्ण घडामोडींवर राज ठाकरेंचे प्रतिक्रिया समोर आली आहे. झी २४ तास या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी अनेक गोष्टींवर भाष्य केले […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) आपल्यासोबत शिवसेनेच्या ४० आमदारांना सोबत घेऊन बंड केले. अगोदर सुरत नंतर गुवाहटी असा प्रवास करुन ते १२ दिवसानंतर महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रात विशेष अधिवेशन होऊन नवीन सरकार स्थापन झाले. या संपूर्ण घडामोडींवर राज ठाकरेंचे प्रतिक्रिया समोर आली आहे. झी २४ तास या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे.

शिंदे गटाला मनसेमध्ये सामील करुन घेणार?

राज्यातील सध्याचे सरकार हे कायदेशीर प्रक्रियेमध्ये अडकले आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाला वेगळी मान्यता मिळाली नाही तर ते मनसेमध्ये जाण्याच्या शक्यता वर्तवल्या जात होत्या. त्यावर आता राज ठाकरेंनी उत्तर दिले आहे. ”बाहेर पडलेले सर्व माझे जुने सहकारी आहेत, मी त्यांच्यासोबत पुर्वी काम केलेले आहे. आणि हा सर्व टेक्नीकल भाग आहे. परंतु उद्या जर त्यांच्याकडून काही प्रस्ताव आला तर त्याबाबत नक्की विचार करेन असे राज ठाकरे म्हणाले आहे.

Raj Thackeray: ”बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंच्या जवळचे ‘बडवे’ सारखेच, मीही त्याचमुळे बाहेर पडलो”

आताचे आमदार फुटण्याचे कारण तेच…राज ठाकरे

दरम्यान आपल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी इतर गोष्टींवर देखील भाष्य केले आहे. ते म्हणाले ”राज्यातील सध्याची परिस्थिती आणि मी बाहेर पडलो त्यावेळची परिस्थिती सारखीच होती. त्या वेळची कारण आणि आताचे आमदार फुटण्याचे कारण तेच आहे. ही कारणं मी त्यावेळेला बाळासाहेबांना सांगितली होती” परंतु काही फरक पडला नाही असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp