BCCI: रोहित-विराटचं टी20 करिअर धोक्यात? आगरकरांच्या संघ निवडीवर प्रश्नचिन्ह
Rohit Sharma- Virat Kohli T20 Feature : बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी वेस्टइंडीज दौऱ्यासाठी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि स्टार खेळाडू विराट कोहलीला (Virat Kohli) संघातून ड्रॉप केले आहे.
ADVERTISEMENT

Rohit Sharma- Virat Kohli T20 Feature : बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी वेस्टइंडीज दौऱ्यासाठी हार्दीक पंड्याकडे (Hardik Pandya) कर्णधारपद,तर उप कर्णधारपद सुर्यकुमार यादवकडे (Surykumar yadav) दिल्याची घोषणा केली आहे. या घोषणेसह आगरकर यांनी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि स्टार खेळाडू विराट कोहलीला (Virat Kohli) संघातून ड्रॉप केले आहे. त्यामुळे आता रोहित आणि विराटचे टी20 करिअर संपुष्ठात आले आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासोबतच अजित आगरकरच्या निवडीवर देखील अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. (ind vs wi rohit sharma virat kohli t20 career the end bcci chief selector ajit agarkar)
अजित आगरकर यांनी 2024 साली होणाऱ्या आयसीसी टी20 वर्ल्ड कपवर लक्ष केंद्रीत करत संघ निवडीला सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून वेस्टइंडीज दौऱ्यासाठी युवा खेळाडूंना संधी देण्यात येत आहे. तर दिग्गग खेळाडूंना ब्रेक देण्यात आला आहे. वेस्टइंडीज दौऱ्यासाठी हार्दीक पड्याला कर्णधारपद देण्यात आले आहे. तर उपकर्णधार पदाची जबाबदारी सुर्यकुमार यादवच्या खांद्यावर देण्यात आली आहे. या खेळाडूंसह संघात यशस्वी जायस्वाल, तिलक वर्मा आणि मुकेश कुमार सारख्या खेळाडूंना संघात संधी देण्यात आली आहे. या खेळाडूंसह संजू सॅमसनची संघात वापसी झाली आहे.
हे ही वाचा : ODI World Cup 2023 : वनडे वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर, भारत-पाक सामना ‘या’ दिवशी
न्युझीलंड विरूद्ध जानेवारी-फेब्रुवारीमध्ये झालेल्या सामन्यात राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा, पृथ्वी शॉ, जितेश शर्मा, वॉशिग्टन सुंदर, शिवम मावी सारखे खेळाडू होते. या सर्व खेळाडू संघातून बाहेर झाले आहेत. पृथ्वी शॉ आणि जितेश शर्माला या सीरीजमध्ये संधी मिळाली नव्हती.तर राहुल त्रिपाठी आणि दीपक हुड्डा फ्लॉप ठरला होता.
टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली 2022 ला टी20 वर्ल्ड कप खेळताना दिसले होते. या स्पर्धेनंतर एकही स्पर्धेत दोघेही खेळताना दिसले नव्हते. त्यात आता नवीन खेळाडूंना संघात संधी देण्याचा विचार बीसीसीआय करते आहे. अशातच रोहित-विराट सारख्या दिग्गद खेळाडूंचे करिअर धोक्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.