Rohit Sharma : 3 वर्षांपासून एकही शतक नाही; मुद्दा छेडताच रोहितनं सोडलं मौन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

रायपूरमध्ये झालेल्या दुसऱ्या वनडेत टीम इंडियाने न्यूझीलंडचा आठ गडी राखून पराभव केला. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मालिकाही जिंकली आहे. टीम इंडियाने केवळ 109 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माने 51 धावांची इनिंग खेळली. सामन्यानंतर रोहित शर्माला त्याच्या फॉर्मबद्दल आणि बरेच दिवस शतक न झळकावण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.

रोहित शर्माने सांगितले की, तो ज्या पद्धतीने खेळत आहे त्यावरून तो खूश आहे. रोहित शर्माने गेल्या 3 वर्षांपासून वनडेमध्ये एकही शतक झळकावलेले नाही, जानेवारी 2020 मध्ये त्याने शेवटचे शतक केले होते. रोहित शर्माला शतक न मिळाल्याबद्दल प्रश्न विचारला असता तो म्हणाला की मी माझ्या खेळात बदल करण्याचा प्रयत्न करत आहे आणि सुरुवातीपासूनच गोलंदाजांवर दबाव टाकत आहे. विरोधी संघावरही दबाव टाकणे खूप गरजेचे आहे, मला माहित आहे की मोठे स्कोअर आलेले नाहीत पण फारशी चिंता नाही.

कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, मी माझ्या फलंदाजीवर समाधानी आहे, माझा दृष्टिकोन चांगला आहे आणि मी ज्या प्रकारे कामगिरी करत आहे त्यावरून मी आनंदी आहे. मला माहित आहे की मोठी धावसंख्या अगदी जवळ आहे. रोहित शर्माने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 51 धावांची खेळी खेळली, ज्यात 5 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. यावर्षी भारताला एकदिवसीय विश्वचषक मायदेशात खेळायचा आहे, अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्मा फॉर्ममध्ये परतेल अशी टीम इंडियाला आशा आहे. रोहित शर्मा हा एकदिवसीय क्रिकेटचा दिग्गज मानला जातो, तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये 10,000 धावांच्या जवळपास आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेबद्दल बोलायचे झाले तर टीम इंडियाने येथे 8 विकेट्सने विजय मिळवला आहे. नाणेफेक जिंकून रोहित शर्माने न्यूझीलंडला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. न्यूझीलंडचा संघ 108 धावांवर गारद झाला होता. भारताकडून मोहम्मद शमीने 3 विकेट घेतल्या, प्रत्युत्तरात टीम इंडियाने केवळ दोन विकेट्स गमावून हे लक्ष्य गाठले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT