विराट कोहलीविरुद्ध खेळाडूंची BCCI कडे तक्रार? आश्विनने मौन सोडलं, म्हणाला…

मुंबई तक

विराट कोहलीने टी-२० संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर भारतीय संघात बेबनाव असल्याच्या काही बातम्या समोर येत आहेत. त्यापैकी इंग्लंड दौऱ्यावर असताना टीम इंडियातल्या काही खेळाडूंनी विराटबद्दल बीसीसीआयकडे तक्रार केल्याचं समजतंय. ज्यात इंग्लंड दौऱ्यात कसोटी सामन्यांमध्ये संधी न मिळालेल्या रविचंद्रन आश्विनचाही समावेश होता अशा बातम्या समोर आल्या. या बातम्यांवर अखेरीस आश्विनने आपलं मौन सोडलं आहे. IANS वृत्तसंस्थेने […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

विराट कोहलीने टी-२० संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर भारतीय संघात बेबनाव असल्याच्या काही बातम्या समोर येत आहेत. त्यापैकी इंग्लंड दौऱ्यावर असताना टीम इंडियातल्या काही खेळाडूंनी विराटबद्दल बीसीसीआयकडे तक्रार केल्याचं समजतंय. ज्यात इंग्लंड दौऱ्यात कसोटी सामन्यांमध्ये संधी न मिळालेल्या रविचंद्रन आश्विनचाही समावेश होता अशा बातम्या समोर आल्या.

या बातम्यांवर अखेरीस आश्विनने आपलं मौन सोडलं आहे. IANS वृत्तसंस्थेने आश्विनने विराटची तक्रार केल्याची बातमी दिली होती.

आश्विनने आपल्या इन्स्टाग्राम हँडलच्या स्टोरीवर या बातम्यांबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. ज्यात तो असं म्हणतो, “‘फेक न्यूज देणाऱ्या हॅण्डलचा मी शोध घेत आहे. गॉसिप करण्यासाठी हे मजेदार आहे”. यानंतर अश्विनच्या चाहत्यांनी त्याला ही बातमी कुठून आली त्याबद्दल सांगितलं, यावर अश्विनने प्रतिक्रिया दिली की, “धन्यवाद मित्रांनो, त्यांनी आता स्वत:चं नाव बदलून आयएएनएस ठेवलं आहे. बाकीची माध्यमं त्यांच्या हवाल्याने वृत्त देत आहेत. खूपच मजा आहे ही”.

हे वाचलं का?

    follow whatsapp