Sarfraz Khan धावांचा पाऊस पाडतोय; तरी टीम इंडियात संधी का नाही?

मुंबई तक

भारतीय संघ सध्या न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे, मात्र सर्वांच्या नजरा फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेकडे लागल्या आहेत. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्यासाठी आणि मोठ्या संघाशी टक्कर देण्यासाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. टीम इंडियात कोणाला संधी मिळते आणि कोणाला नाही अशी चर्चा आहे. दरम्यान, 25 वर्षीय सरफराज खानबाबत गेल्या काही दिवसांपासून बाजार […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

भारतीय संघ सध्या न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे, मात्र सर्वांच्या नजरा फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेकडे लागल्या आहेत. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्यासाठी आणि मोठ्या संघाशी टक्कर देण्यासाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. टीम इंडियात कोणाला संधी मिळते आणि कोणाला नाही अशी चर्चा आहे. दरम्यान, 25 वर्षीय सरफराज खानबाबत गेल्या काही दिवसांपासून बाजार चांगलाच तापला आहे.

कारण सरफराज खानने देशांतर्गत क्रिकेटमध्ये शतकी धावा केल्या आहेत. प्रत्येक दिवसागणिक सर्फराज खानला टीम इंडियामध्ये प्रवेश का मिळत नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. कारण सर्फराज खान सातत्याने धावा करत आहे. पण त्याला टीम इंडियात एन्ट्री का मिळत नाहीये, असं विचारलं जात आहे.

वय किंवा फिटनेस हे कारण आहे का?

सरफराज खान 25 वर्षांचा आहे, पण देशांतर्गत क्रिकेटमधला त्याचा विक्रम पाहता तो बराच काळ क्रिकेट खेळत असल्यासारखे वाटते. एवढ्या लहान वयातही त्याने धडाकेबाज शतके झळकावली असली तरी त्याला टीम इंडियात संधी मिळत नाहीये. टीम इंडियाच्या मधल्या फळीसाठी त्याला अधिक तयारी करावी लागेल, असा युक्तिवादही केला जात आहे. पण आकडेवारी काही वेगळीच साक्ष देते.

जर अनुभव हे कारण असेल तर ते सरफराजवर अन्यायकारक ठरेल, कारण त्याच्यापेक्षा लहान खेळाडूही सध्या टीम इंडियात खेळत आहेत. शुभमन गिल, ऋषभ पंत, इशान किशनसारखे खेळाडू देखील याच वयोगटातील आहेत आणि टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करत आहेत. आणखी एक तर्क फिटनेसबाबतही येतो, कारण सरफराज खानचे वजन जास्त आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp