"गौतम गंभीर जास्त दिवस टिकणार नाही, कारण...", माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान
Gautam gambhir head coach : भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक बनलेल्या गौतम गंभीरबद्दल वर्ल्ड कप विजेत्या संघातील माजी खेळाडूने मोठं विधान केले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

गौतम गंभीरच्या स्वभावाबद्दल मोठे विधान

जोगिंदर शर्माने गौतम गंभीरबद्दल काय बोलला?

गौतम गंभीर कधीपर्यंत असणार मुख्य प्रशिक्षक?
Gautam Gambhir News : 2007 च्या टी २० वर्ल्ड कपमधील हिरो जोगिंदर शर्माने टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याबद्दल मोठा दावा केला आहे. भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी गौतम गंभीर जास्त दिवस टिकणार नाही, असे जोगिंदर शर्माने म्हटले आहे. यामागील कारणही त्याने सांगितले आहे. (Joginder Sharma has said that Gautam Gambhir, the head coach of Team India, will not last long)
एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये जोगिंदर शर्मा गौतम गंभीरबद्दल बोलला आहे. त्याने गौतम गंभीरच्या स्वभावाबद्दलही भाष्य केले.
गौतम गंभीर टीम इंडियाला सांभाळेल, पण...
जोगिंदर शर्मा म्हणाला की, "गौतम गंभीर संघाला सांभाळेल, पण माझे असे मत आहे की, गंभीर जास्त काळ टिकणार नाही. कारण गौतम गंभीरचे स्वतःचे काही निर्णय असतात. असे होऊ शकते की, कुठल्या खेळाडूसोबत वाद होईल. मी विराट कोहलीबद्दल बोलत नाहीये. गंभीरचे निर्णय अनेकदा असे असतात की, दुसऱ्यांना आवडत नाही."
हेही वाचा >> सेल्फीचा नाद पडला भारी! पुण्यातील तरुणी कोसळली दरीत, व्हिडीओ बघा
जोगिंदर शर्मा पुढे म्हणाला, "गौतम गंभीर स्पष्टवक्ता आहे. तो कुणाकडे जाणारा नाहीये. गौतम गंभीर हुजरेगिरी करणारा माणूस नाही. त्याला श्रेय देणारे आम्ही लोक आहोत. तो त्याचे काम करतो. मनापासून आणि प्रामाणिकपणे करतो."