Tokyo Olympics 2020 मध्ये काय आहे महाराष्ट्राच्या खेळाडूंचं Report Card?
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी उत्तरार्धात पदकांची कमाई केली. पहिल्या दिवशी वेटलिफ्टींगमध्ये मीराबाई चानूने पदक मिळवून दिल्यानंतर, पी.व्ही.सिंधूच्या रुपाने भारताला दुसरं मिळालं. मध्यंतरीचा काळ भारतीय खेळाडूंसाठी थोडासा खडतर गेला. सिंधूचं कांस्यपद, बॉक्सिंगमध्ये लोवलिनाचं कांस्यपदक, कुस्तीत रवी कुमारचं रौप्यपदक, हॉकीत ४१ वर्षांनी पुरुष संघाला मिळालेलं कांस्यपदक या सर्व पदकांमुळे भारतात सध्या आनंदाचं वातावरण आहे. परंतू या सर्वांमध्ये […]
ADVERTISEMENT

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी उत्तरार्धात पदकांची कमाई केली. पहिल्या दिवशी वेटलिफ्टींगमध्ये मीराबाई चानूने पदक मिळवून दिल्यानंतर, पी.व्ही.सिंधूच्या रुपाने भारताला दुसरं मिळालं. मध्यंतरीचा काळ भारतीय खेळाडूंसाठी थोडासा खडतर गेला. सिंधूचं कांस्यपद, बॉक्सिंगमध्ये लोवलिनाचं कांस्यपदक, कुस्तीत रवी कुमारचं रौप्यपदक, हॉकीत ४१ वर्षांनी पुरुष संघाला मिळालेलं कांस्यपदक या सर्व पदकांमुळे भारतात सध्या आनंदाचं वातावरण आहे.
परंतू या सर्वांमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व कुठेच पहायला मिळालं नाही. टोकियो ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राचे ८ खेळाडू पात्र ठरले होते. ज्यापैकी ६ खेळाडू हे मुख्य स्पर्धेसाठी तर दोन खेळाडू हे पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरले होते. परंतू दुर्दैवाने सहापैकी एका खेळाडूला ऑलिम्पिक पातळीवर आपली छाप पाडता आली नाही. जाणून घेणार आहोत कशी राहिली महाराष्ट्राच्या खेळाडूंची ऑलिम्पिक मधली कामगिरी…
पदकांचा दुष्काळ संपला ! Tokyo Olympics मध्ये भारतीय हॉकी संघाला कांस्यपदक
१) राही सरनौबत – महाराष्ट्रातल्या नावाजलेल्या नेमबाजांपैकी एक म्हणून राही सरनौबतचं नाव घेतलं जातं. यंदाच्या ऑलिम्पिकसाठी राही सरनौबतला २५ मी. पिस्तुल प्रकारात स्थान मिळालं होतं. परंतू इथे राही आपली छाप पाडू शकली नाही. २९ जुलै रोजी झालेल्या पहिल्या राऊंडमध्ये Precision प्रकारात राही ४४ खेळाडूंमध्ये थेट २५ व्या स्थानावर फेकली गेली.