IPL 2021 : प्ले-ऑफमध्ये दाखल होण्याची मुंबई इंडियन्सला किती संधी?
सलग तीन पराभवांचा सामना करावा लागल्यानंतर गतविजेत्या मुंबई इंडियन्सने मंगळवारी झालेल्या सामन्यात पंजाबच्या संघावर ६ विकेट राखून मात केली. लागोपाठ तीन पराभवांमुळे मुंबईचा संघ चौथ्या स्थानावरुन सातव्या स्थानावर घसरला होता. परंतू पंजाबच्या संघावर मिळवलेल्या विजयानंतर मुंबईचा संघ पुन्हा एकदा पाचव्या स्थानावर आला आहे. पंजाबच्या संघावर मिळवलेल्या विजयानंतर मुंबईचं या स्पर्धेतलं आव्हान कायम राहिलेलं असून प्ले-ऑफची […]
ADVERTISEMENT

सलग तीन पराभवांचा सामना करावा लागल्यानंतर गतविजेत्या मुंबई इंडियन्सने मंगळवारी झालेल्या सामन्यात पंजाबच्या संघावर ६ विकेट राखून मात केली. लागोपाठ तीन पराभवांमुळे मुंबईचा संघ चौथ्या स्थानावरुन सातव्या स्थानावर घसरला होता. परंतू पंजाबच्या संघावर मिळवलेल्या विजयानंतर मुंबईचा संघ पुन्हा एकदा पाचव्या स्थानावर आला आहे.
पंजाबच्या संघावर मिळवलेल्या विजयानंतर मुंबईचं या स्पर्धेतलं आव्हान कायम राहिलेलं असून प्ले-ऑफची फेरी गाठण्यासाठी त्यांना यापुढील सामन्यांमध्ये कठोर मेहनत घ्यावी लागणार आहे.
जाणून घेऊयात काय असेल मुंबई इंडियन्ससाठी प्ले-ऑफ मध्ये पात्रतेचा निकष?
पंजाबवर मिळवलेल्या विजयानंतर मुंबईने पॉईंट्स टेबलमध्ये उडी मारत पुन्हा एकदा पाचवं स्थान पटकावलं आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांचे ११ सामन्यांत ५ विजयांसह १० गुण झाले आहेत. परंतू रनरेट चांगला असल्यामुळे कोलकात्याने चौथं स्थान मिळवलं आहे. यानंतर हे दोन्ही संघ आता पुन्हा समोरासमोर येणार नाहीयेत.