विजय हजारे ट्रॉफीसाठी मुंबई संघाची घोषणा, श्रेयस अय्यरचं कमबॅक
सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत निराशाजनक कामगिरी केल्यानंतर भानावर आलेल्या मुंबईने विजय हजारे ट्रॉफीसाठी संघाची घोषणा केली आहे. संघाची निवड करण्याआधी MCA ने १०० संभाव्य खेळाडूंची नाव काढून त्यात ४ संघ तयार करुन आधी सराव सामने खेळवले होते. यात चांगली कामगिरी करणाऱ्या प्लेअर्सला मुंबईच्या संघात स्थान देण्यात आलंय. श्रेयस अय्यरने मुंबईच्या संघात पुनरागमन केलं असून त्याच्याकडे […]
ADVERTISEMENT

सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत निराशाजनक कामगिरी केल्यानंतर भानावर आलेल्या मुंबईने विजय हजारे ट्रॉफीसाठी संघाची घोषणा केली आहे. संघाची निवड करण्याआधी MCA ने १०० संभाव्य खेळाडूंची नाव काढून त्यात ४ संघ तयार करुन आधी सराव सामने खेळवले होते. यात चांगली कामगिरी करणाऱ्या प्लेअर्सला मुंबईच्या संघात स्थान देण्यात आलंय.
श्रेयस अय्यरने मुंबईच्या संघात पुनरागमन केलं असून त्याच्याकडे टीमची कॅप्टन्सी सोपवण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खराब कामगिरीमुळे चर्चेत असलेल्या पृथ्वी शॉला संघाचं उप-कर्णधारपद देण्यात आलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे सराव सामन्यांमध्ये खराब कामगिरी केलेल्या अर्जुन तेंडुलकरला संघात स्थान देण्यात आलेलं नाही. अर्जुनला एका सराव सामन्यात संधी देण्यात आली ज्यात त्याची कामगिरी ४.१ ओव्हर, ५३ रन्स आणि ० विकेट अशी होती. इतकच नव्हे तर या सामन्यात त्याने ९ वाईड बॉल टाकले.
असा असेल मुंबईचा विजय हजारे ट्रॉफीसाठीचा संघ –
श्रेयस अय्यर (कॅप्टन), पृथ्वी शॉ (व्हाईस कॅप्टन), यशस्वी जैस्वाल, अखिल हेरवाडकर, सूर्यकुमार यादव, सर्फराज खान, चिन्मय सुतार, आदित्य तरे, हार्दिक तामोरे, शिवम दुबे, आकाश पारकर, अतिफ अत्रावाला, शम्स मुलानी, अथर्व अंकोलेकर, साईराज पाटील, सुजीत नायक आणि तुषार कोटीयन