भारत-पाक क्रिकेट संघाच्या फाळणीची कथा, जाणून घ्या गुल-इलाही-कारदारची आश्चर्यकारक कहाणी
IND vs PAK : 1947 चा काळ जेव्हा भारत आणि पाकिस्तान वेगळे झाले. खेळाच्या दृष्टीनेही तो एक वेगळा टप्पा होता, कारण केवळ दोन देशच नाही तर खेळाडूही विभागले गेले होते. कोणता खेळाडू कोणत्या देशात राहणार आणि कुठे खेळणार? हे ठरवणे देखील अवघड होते. कारण पाकिस्तानला भारतापासून वेगळे व्हावे लागले. याआधी पाकिस्तान अस्तित्वात नव्हता. अशा स्थितीत […]
ADVERTISEMENT

IND vs PAK : 1947 चा काळ जेव्हा भारत आणि पाकिस्तान वेगळे झाले. खेळाच्या दृष्टीनेही तो एक वेगळा टप्पा होता, कारण केवळ दोन देशच नाही तर खेळाडूही विभागले गेले होते. कोणता खेळाडू कोणत्या देशात राहणार आणि कुठे खेळणार? हे ठरवणे देखील अवघड होते.
कारण पाकिस्तानला भारतापासून वेगळे व्हावे लागले. याआधी पाकिस्तान अस्तित्वात नव्हता. अशा स्थितीत पाकिस्तानचा नवा संघ तयार होणे साहजिकच होते आणि भारत सोडून गेलेल्या खेळाडूंनाच पाकिस्तानचे क्रिकेट, हॉकी आणि इतर संघ बनवायचे होते. यात क्रिकेटची भूमिका काहीशी वेगळी होती.
त्यावेळी भारतात क्रिकेट फारसे लोकप्रिय नव्हते. ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक सुवर्ण जिंकणारा हॉकी संघ वर्चस्व गाजवत होता. आशियामध्ये क्रिकेटचा दबदबा 1983 नंतर आला, जेव्हा भारतीय संघाने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकला. बरं, विषय फाळणीचा चालू आहे, तेव्हा भारतीय संघातून असे तीन खेळाडू खेळत होते, ज्यांनी कोणत्या देशात राहायचे हे ठरवायचे होते.
हे खेळाडू होते फिरकी अष्टपैलू अब्दुल हाफीज कारदार, वेगवान गोलंदाज अष्टपैलू गुल मोहम्मदसह अमीर इलाही. इलाही मध्यमगती गोलंदाज आणि फिरकी गोलंदाज होता. या तिन्ही खेळाडूंच्या कथा अप्रतिम आहेत. यापैकी कारदार आणि इलाही यांनी पाकिस्तानला जाऊन एकाच संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला. तर गुलने भारतीय संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला. गुलने पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या मालिकेत त्याच्याविरुद्ध सामना खेळला होता. पण गुलचा भारताकडून खेळण्याचा निर्णय 1952 पर्यंतच सिमीत राहिला होता. यावर्षी भारत आणि पाकिस्तान यांच्यात कसोटी मालिका खेळली गेली. त्यानंतर गुलने पाकिस्तानकडून खेळण्याचा निर्णय घेतला.