Ind Vs Aus : १ मॅच ४ लक्ष्य… टीम इंडियासाठी इंदौरची मॅच का आहे महत्त्वाची?

मुंबई तक

India vs Australia : इंदौर : भारत-ऑस्ट्रेलियामधील (India vs Australia) बॉर्डर-गावस्कर (Border-Gavaskar trophy) ट्रॉफीतील तिसरा सामना १ मार्चपासून इंदौरमध्ये खेळवला जाणार आहे. यापूर्वी या मालिकेतील दोन्हीही सामने मोठ्या फरकाने जिंकत भारताने २-० अशी आघाडी घेतली आहे. आता तिसऱ्या कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन मालिका जिंकण्यासाठी आणि सलग चौथ्यांदा बॉर्डर-गावसकर ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी टीम इंडियाचा प्रयत्न असणार […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

India vs Australia :

इंदौर : भारत-ऑस्ट्रेलियामधील (India vs Australia) बॉर्डर-गावस्कर (Border-Gavaskar trophy) ट्रॉफीतील तिसरा सामना १ मार्चपासून इंदौरमध्ये खेळवला जाणार आहे. यापूर्वी या मालिकेतील दोन्हीही सामने मोठ्या फरकाने जिंकत भारताने २-० अशी आघाडी घेतली आहे. आता तिसऱ्या कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन मालिका जिंकण्यासाठी आणि सलग चौथ्यांदा बॉर्डर-गावसकर ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी टीम इंडियाचा प्रयत्न असणार आहे. याशिवाय जर हा सामना भारताने जिंकला तर आणखी दोन मोठ्या गोष्टी भारताच्या हाती लागणार आहेत. (Australia is eager for a comeback. Team India wants to win the series and secure their ticket to the finals of the World Test Championship)

इंदौरचा सामना जिंकला तर काय?

इंदौरचा कसोटी सामना जिंकल्यास, टीम इंडिया मालिका तर जिंकेलच. पण याशिवाय चौथ्यांदा बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खिशात घालणार आहे. शिवाय अधिकृतपणे कसोटी क्रमवारीत नंबर-१ बनू शकणार आहे. तसंच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ च्या अंतिम फेरीतही भारताचं स्थान पक्क होणार आहे.

Ind vs Aus: तिसऱ्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाला झटका; कर्णधार कमिन्स घरी परतला

हे वाचलं का?

    follow whatsapp