तिहेरी हत्याकांडानं सोलापूर हादरलं, आई आणि मुलीचा मृतदेह घराच्या गच्चीवर; तर मुलगा रक्ताच्या थारोळ्यात

Solapur crime : सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात ट्रिपल मर्डरने तालुका हादरून गेला आहे. मध्यरा‍त्री अज्ञातांनी आई आणि मुलांवर दोन तलवारीने हल्ला करून निर्दयीपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आई आणि मुलीचा मृतदेह घराच्या गच्चीवर तर मुलगा रक्ताच्या थारोळ्यात आढळला.

Solapur Crime

Solapur Crime

मुंबई तक

• 06:25 PM • 02 May 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

तिहेरी हत्याकांडानं सोलापूर हादरलं

point

आई आणि मुलीचा मृतदेह घराच्या गच्चीवर; तर मुलगा रक्ताच्या थारोळ्यात

Solapur Crime : सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात ट्रिपल मर्डरने तालुका हादरून गेला आहे. मध्यरा‍त्री अज्ञातांनी आई आणि मुलांवर दोन तलवारीने हल्ला करून निर्दयीपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणातील मृतांची ओळख गायत्री सुधाकर मस्के (वय 42),  प्रिया मस्के (वय 18) आणि इयत्ता दहावीत शिक्षण घेणारा शिवराय मस्के (वय 16) यांचा समावेश होत आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : गर्लफ्रेंडच्या नवऱ्याला पाठवले तिचे शारीरिक संबंध करतानाचे व्हिडिओ, बायकोचे 'ते' Video पाहून नवऱ्याने...

तिहेरी हत्याकांडानं सोलापूर हादरलं

या तिघांवरही अज्ञातांनी क्रूरपणे हल्ला करत हत्या करण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेमागे संपत्तीवरून वाद झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेनं गावातील लोकांनी शोक व्यक्त केला असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. 

आई आणि मुलीचा मृतदेह घराच्या गच्चीवर, तर मुलगा रक्ताच्या थारोळ्यात 

घटनास्थळी आढळलेल्या परिस्थितीनुसार, आई आणि मुलीचा मृतदेह घराच्या गच्चीवर तर मुलाचा मृतदेह बैठकी खोलीत रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली असून संतापजनक वातावरण निर्माण झाले. संबंधित घटनेची माहिती मिळताच, सोलापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 

हे ही वाचा : नवरा तरुणाला फ्लॅटवर बोलावून नको तेच .., बायकोचे गंभीर आरोप, असं बाहेर आणलं नवऱ्याचं कांड

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता, हत्येचा तपास सुरु आहे. या भीषण हत्या घटनेनं बोरामणी गावासह संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरून गेल्याचं चित्र आहे.  नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर येऊन ठाकला आहे. गेली काही वर्षांपासून राज्यातील वाढत्या गुन्हेगारीमुळे चिंतेची बाब निर्माण झाली आहे.