धक्कादायक... वाल्मिकने खंडणी मागितलेल्या अवादा कंपनीतील कामगाराचा मृत्यू, रस्त्यावरच सापडला मृतदेह

Avaada Company Worker Death: अवादा कंपनीतील एका कामगाराचा अचानक झालेल्या मृत्यूने पुन्हा एकदा बीडमध्ये खळबळ माजली आहे.

अवादा कंपनीतील कामगाराचा मृत्यू

अवादा कंपनीतील कामगाराचा मृत्यू

मुंबई तक

17 Jan 2025 (अपडेटेड: 17 Jan 2025, 11:17 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

अवादा पवन ऊर्जा कंपनीतील कामगाराचा मृत्यू

point

पंजाबच्या मजुराचा केज येथील रोडवर मृत्यू झाला

point

मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही

बीड: संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील अवादा कंपनी ही सध्या प्रचंड चर्चेत आहे. अशातच आता याच कंपनीतील एका कामगाराचा अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ही समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बीडमध्ये खळबळ माजली आहे. 

हे वाचलं का?

नेमकी घटना काय?

पंजाब राज्यातील हा कामगार केज तालुक्यातील मस्साजोग येथील अवादा एनर्जी या पवन ऊर्जा कंपनीत मजूर म्हणून काम करीत होता. त्याचे नाव रचपाल हमीद मसीह असून तो पंजाब राज्यातील गुरुदासपूर येथील रहिवासी आहे.

हे ही वाचा>> Beed Crime: बीड पुन्हा हादरलं! दोन सख्ख्या भावांचा खून, तिसरा भाऊ गंभीर जखमी, घडलंय तरी काय?

केज शहरातील केज-अंबाजोगाई रोडवर असलेल्या बारसमोरच  मृतदेह रस्त्यावर पडला असल्याचे आढळून आले. केज पोलिसांनी हा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ताब्यात घेतला आहे. आता या प्रकरणाचा तपास केज पोलीस करत आहेत.

अवादा कंपनीतील या कामगाराचा नेमका मृत्यू कशाने झाला याबाबत मात्र गूढ कायम आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी आता पोलिसांनी देखील चौकशी सुरू केली. त्यामुळे आता या कामगाराचा नेमका कसा आणि कशामुळे मृत्यू झाला याचं कारण शोधण्याचं मोठं आव्हान बीड पोलिसांसमोर आहे. 

अवादा कंपनीकडे वाल्मिक कराडने मागितलेली 2 कोटींची खंडणी 

पवन उर्जा निर्माण करणारी अवादा कंपनी ही बीडमध्ये आहे. याच कंपनीकडे तब्बल 2 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप हा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर आहे.

हे ही वाचा>> Today Gold Rate: सोनं खरेदी करणाऱ्यांना फुटला घाम! 24 कॅरेट 80 हजारांपार, 22 कॅरेट...तुमच्या शहरात भाव काय?

दरम्यान, याच सगळ्या खंडणी प्रकरणाच्या वादातून मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर निर्घृण हत्या करण्यात आली होती. ज्यानंतर या संपूर्ण घटनेबाबत भाजप आमदार सुरेश धस यांनी थेट विधानसभेत आवाज उठवला. त्यानंतर या सगळ्या प्रकरणातील राजकीय बाजूही समोर आली. 

दुसरीकडे अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मिक कराड याच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे या प्रकरणी कराड हा पोलिसांना शरण आला होता. पण त्यानंतर SIT ने वाल्मिक कराड याला संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी करून त्याच्यावर मकोका लावला आहे. 

दरम्यान, या सगळ्या प्रकरणात वाल्मिक कराड याला अटक करण्यात आल्यापासूनच राज्यातील कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी ही सातत्याने केली जात आहे. मात्र, अद्याप तरी त्यांचा राजीनामा घेण्यात आलेला नाही.

    follow whatsapp