मस्करीत मुलीवरून चिडवलं अन् वाद पेटला... रागात मित्राचा गळाच चिरला

मुंबईतील तुर्भेमध्ये एका मुलीच्या नावावरुन मित्राचं चिडवणं सहन झाल्याने मित्राचा गळाच चिरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

मस्करीत मुलीवरून चिडवलं अन् वाद पेटला... रागात मित्राचा गळाच चिरला

मस्करीत मुलीवरून चिडवलं अन् वाद पेटला... रागात मित्राचा गळाच चिरला

मुंबई तक

21 Jun 2025 (अपडेटेड: 21 Jun 2025, 10:29 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मित्रांमधील मस्करी जीवावर बेतली

point

मुलीच्या नावावरुन चिडवल्यामुळे मित्राचीच हत्या

Navi Mumbai News: अनेकदा मस्करीचं रुपांतर मोठ्या वादात होत असल्याच्या घटना पाहायला मिळतात. मित्रासोबत केलेल्या गंमतीचं मोठ्या वादात रुपांतर होऊन ते जीवावर बेतल्याच्या बऱ्याच घटना घडत असतात. मुंबईतील तुर्भेमध्ये देखील असाच काहीसा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. एका मुलीच्या नावावरुन मित्राचं चिडवणं सहन झाल्याने मित्राचा गळाच चिरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत मृत पावलेला तरुण 22  वर्षांचा असून त्याचं नाव संजय बेहरा असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच, ज्या तरुणाने त्याचा गळा चिरून खून केला, त्या 20 वर्षीय तरुणाचं नाव सुरेश होनहागा असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांकडून झालेल्या चौकशीत, संजय नेहमी मुलीवरून चिडवत असल्याने बदनामी होत होती आणि हे सहन न झाल्यामुळे त्या सुरेशने त्याचा खून केल्याचा गुन्हा कबूल केला आहे.

हे ही वाचा: 'इथं सिगारेट पिऊ नका' तरुणाने पर्यटकांना सांगितलं अन् आरोपींनी दगडाने ठेचत...पानशेत हादरलं

नेमकं काय घडलं?  

संजय आणि सुरेश हे दोघे मित्र असून संजय नेहमी सुरेशला एका मुलीच्या नावावरुन चिडवत होता. मात्र, सुरेशला त्या मुलीच्या नावाने चिडवणं अजिबात आवडत नव्हतं. त्याच्या मते, मुलीच्या नावाने चिडवल्यामुळे त्याची बदनामी होत होती. संजयला सुरेशने याबद्दल आधी समजसुद्धा दिली होती. या प्रकरणामुळे त्या दोघांमध्ये आधी मोठा वादसुद्धा झाला होता. मात्र, तरीही तो सुरेशला मुलीवरुन चिडवत असल्याचं सुरेशला कळालं. याचा सुरेशला खूप मनस्ताप झाला. मुलीच्या नावाने चिडवल्यामुळे होत असलेली बदनामी त्याला सहन झाली नाही आणि हाच राग मनात घेऊन त्याने संजयची हत्या केली.

हे ही वाचा: डेटिंग अॅपवर झाली मैत्री अन् जडलं प्रेम, पण गरोदर राहिल्यानंतर छळ अन्...

कशी केली हत्या

याच प्रकरणामुळे सुरेशने संजयचा काटा काढण्याचे ठरवले आणि त्याला एके दिवशी तो घटदाट जंगलात घेऊन गेला. त्यावेळी सुरेशने संजयला खेकडी पकडायला जाण्याचं कारण सांगितलं. त्यावेळी त्या परिसरात एक 13 वर्षीय मुलगा देखील तिथे होता. त्या घनदाट झाडीत गेल्यानंतर त्यावेळी त्या दोघांनी दारूसुद्धा प्यायली. दारु प्यायल्यामुळे संजय नशेत होता. संजय नशेत असल्याची संधी साधून सुरेशने त्याच्या कटरने वार करुन त्याचा गळा कापला आणि यात संजयचा मृत्यू झाला. तिथे असलेल्या त्या 13 वर्षीय मुलाने हे सगळं पाहिलं. सुरेशला या घटनेबद्दल पश्चात्ताप झाला आणि बुधवारी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याने त्याच्या गुन्हा पोलिसांसमोर कबूल केला.

    follow whatsapp