जालना : अंगावर सीमा अन् खुशी नावाचे दोन टॅटू, विहिरीत अज्ञात व्यक्तीचा सडलेला मृतदेह आढळला, पाहू देखील वाटेना!

Jalna crime news : हा मृतदेह गेल्या अनेक दिवसांपासून पाण्यात असल्याने तो पूर्णपणे फुगलेला आणि सडलेल्या अवस्थेत आहे. मृतदेहाचा चेहरा ओळखण्यापलीकडे गेला असून, पाहणाऱ्याच्या अंगावर काटा येईल अशी स्थिती निर्माण झाली आहे. मृत व्यक्तीचे वय अंदाजे 35 ते 40 वर्षे असल्याचे प्राथमिक अंदाजानुसार सांगण्यात येत आहे.

Jalna crime news

Jalna crime news

मुंबई तक

25 Feb 2026 (अपडेटेड: 25 Feb 2026, 03:31 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

जालना : अंगावर सीमा अन् खुशी नावाचे दोन टॅटू

point

विहिरीत अज्ञात व्यक्तीचा सडलेला मृतदेह आढळला, पाहू देखील वाटेना!

Jalna crime news,जालना : जालना जिल्ह्यातील रोहनवाडी शिवारात आज एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. हा मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत असून, त्याची अवस्था इतकी भीषण आहे की तो पाहणेही अशक्य झाले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, ही हत्या आहे की आत्महत्या, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

हे वाचलं का?

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, जालन्याजवळील रोहनवाडी येथील एका शेतातील विहिरीत आज दुपारच्या सुमारास काही ग्रामस्थांना दुर्गंधी जाणवली. विहिरीत डोकावून पाहिले असता, एका पुरुषाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. ग्रामस्थांनी तातडीने या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह विहिरीबाहेर काढला.

मृतदेहाची भीषण अवस्था

हा मृतदेह गेल्या अनेक दिवसांपासून पाण्यात असल्याने तो पूर्णपणे फुगलेला आणि सडलेल्या अवस्थेत आहे. मृतदेहाचा चेहरा ओळखण्यापलीकडे गेला असून, पाहणाऱ्याच्या अंगावर काटा येईल अशी स्थिती निर्माण झाली आहे. मृत व्यक्तीचे वय अंदाजे 35 ते 40 वर्षे असल्याचे प्राथमिक अंदाजानुसार सांगण्यात येत आहे.

ओळखीसाठी 'टॅटू'चा मोठा आधार

पोलिसांसमोर सध्या या व्यक्तीची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान आहे. मात्र, मृतदेहाच्या हातावर गोंदलेली नावे तपासासाठी महत्त्वाची ठरू शकतात. मयताच्या हाताच्या पंजाच्या पाठीमागील बाजूस ‘खुशी’ आणि ‘वंश’ अशी नावे गोंदलेली आहेत, तर हातावर 'सीमा’ आणि ‘साईनाथ’ अशी नावे आहेत. या नावांवरून पोलिसांनी आता तपास सुरू केला असून, जिल्ह्यातील बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींची पडताळणी केली जात आहे.

हत्या की आत्महत्या? चर्चांना उधाण

हा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. संबंधित व्यक्तीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली की त्याची हत्या करून मृतदेह विहिरीत फेकून देण्यात आला, या संशयाने परिसरात चर्चांना उधाण आले आहे. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

रोहनवाडी येथील या घटनेने संपूर्ण जालना तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जर कोणाला या वर्णनाची व्यक्ती किंवा हातावर अशी नावे गोंदलेला कोणी नातेवाईक अथवा परिचित बेपत्ता असल्याची माहिती असल्यास, त्यांनी तातडीने जालना पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा. मृतदेहाची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले असून, संबंधित व्यक्तीबाबत माहिती असल्यास जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Govt Job: कोणत्याही परीक्षेशिवाय SBI मध्ये थेट मोठ्या पदाची नोकरी! तगडा पगार अन्.. कधीपर्यंत कराल अर्ज?
 

    follow whatsapp