Ajit Pawar on Devendra Fadnavis, Mumbai : गेल्या काही वर्षात पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सातत्याने कोयता गँगने दहशत पसरवलेली पाहायला मिळाली. अगदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील अनेक सभा-मुलाखतींमध्ये याचा उल्लेख केला. "पिंपरी-चिंचवडसारख्या आशिया खंडातील श्रीमंत महानगरपालिकेची अवस्था बिकट झाली आहे. ज्यांच्या हाती तुम्ही सूत्रे दिली, त्यांनी शहर नीट सांभाळलं नाही. टँकर माफिया, दहशत, दादागिरी, हफ्तेवसुली, कोयता गँग यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. शहरात गुंडागर्दी वाढली आहे, तरुण पिढी वाया जात आहे आणि नवीन व्यावसायिकांनाही धमकावलं जात आहे", अशी भूमिका मांडत अजित पवारांनी दोन दिवसांपूर्वी सत्ताधारी भाजपला घेरलेलं पाहायला मिळालं.
ADVERTISEMENT
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अपयशी आहेत? असं म्हणणार का? अजित पवारांचं प्रत्युत्तर
दरम्यान, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी 'मुंबई तक'ला दिलेल्या मुलाखतीत देखील कोयता गँगच्या दहशतीचा मुद्दा बोलून दाखवला. "मात्र, तुम्ही कोयता गँगची पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दहशत आहे म्हणत आहात. मग गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अपयशी आहेत? असं म्हणणार का?", असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला होता. याबाबत त्यांनी भाष्य केलंय.
अजित पवार उत्तर देताना म्हणाले, पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये कोयता गँग आहे. अल्पवयीन मुलांचा मोठ्या प्रमाणात एक ग्रुप येतो. टू व्हिलर असतील त्या जाळून टाकतो. फोर व्हिलरच्या काचा फोडून टाकतो. स्थानिक लिडरशीपचा वरदहस्त या सगळ्या गँगला आहे, असं अजित पवार म्हणाले. यावेळी अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांबाबत बोलणे टाळलेले पाहायला मिळाले.
हेही वाचा : अहिल्यानगर : कंदुरीच्या कार्यक्रमात मित्रांमध्ये वाद, बोकड कापण्यासाठी आलेल्या व्यक्तीवर गोळ्या झाडल्या
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, जगामध्ये ज्या शहरांमध्ये प्रदुषण वाढलंय. त्यामध्ये पुणे पण आहे आणि पिंपरी चिंचवड देखील आहे. त्यामुळे आजार पण होत आहेत. व्हायरल इन्फेक्शन होत आहे, लोकांचा घसा बसतोय. प्रदुषणातील डस्ट आणि धूर दिसत नाही. त्याचा त्रास सगळ्यांना होतो.
राष्ट्रवादीसोबतच्या युतीबाबत अजित पवार काय म्हणाले?
मी एकनाथ शिंदे यांना विचारलं, भाजप पुण्यात स्वतंत्र लढायचं म्हणतोय. आपण एकत्र यायचं का? ते म्हणाले नाही. माझी भाजप आणि मित्र-पक्षांबरोबर चर्चा सुरु आहे. शेवटच्या एबी फॉर्म द्यायच्या आधी त्यांचा (एकनाथ शिंदे) फोन आला. ते म्हणाले, आमचं आणि त्याचं जमत नाही, आपण एकत्र यायचं का? मग मी त्यांना म्हणालो, साहेब मी अगोदरच तुम्हाला विचारल होतं, आपण एकत्र यायचं का? आता मी उमेदवार फिक्स केलेले आहेत. आता आपण एकत्र आलो तर माझे लोकं नाराज होतील, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं. मग मतविभाजन होऊ नये. आपली संख्या वाढावी यासाठी तुतारीशी युतीचे प्रयत्न केले. पहिल्यांदा चर्चा झाली तेव्हा फिस्कटलं. पण नंतर युती झाली.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











