Dharmendra pradhan resign : सध्याची मोठी बातमी समोर येत असून, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. दिल्लीच्या जंतरमंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. या घटनेनं दिल्लीत मोठी घडामोड निर्माण झाली आहे. कॉक्रोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं बळ मिळालं, मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर विद्यार्थ्यांना मोठं यश मिळालं आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी 'X' वर ट्विट करत राजीनाम्याची माहिती दिली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : जेन 'झी'च्या क्रांतीचा वणवा देशभर, कँडल मार्च काढून देशव्यापी आंदोलन
धर्मेंद्र प्रधान यांचं ट्विट
राजीनाम्याबाबत काय म्हणाले धर्मेंद्र प्रधान?
राजीनाम्यात त्यांनी म्हटलं की, "गेल्या 4 दशकांपर्यंतच्या अधिककाळात विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण सुधारणेसाठी मी समर्पितच राहिले आहे. एक सशक्त, सर्वसमावेशक आणि दूरदृष्टी असलेल्या शिक्षण व्यवस्थेत राष्ट्राची पायाभरणी असते, यावर माझा नेहमीचाच विश्वास राहिलेला आहे. "
हे ही वाचा : जंतर-मंतरवर पुन्हा एकदा तणाव, आंदोलक आणि पोलीस आमने-सामने; काय घडलं?
"देशातील आकांक्षा, भावना आणि रास्त अपेक्षांचा मनापासून आदर करतो. भारतातील तरूण पिढीची स्वप्ने साकार करणे हा आपल्या सर्वांच्या राजकीय आणि सामाजित जीवनाचा नैतिक संकप्ल राहिलेला आहे. तसेच पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखाली मला जी काम करण्याची संधी मिळाली. त्याचा मी आभारी आहे", असं त्यांनी पोस्ट करत माहिती दिली.
ADVERTISEMENT












