Ravindra Waikar यांना मोठा दिलासा, भूखंड घोटाळ्याविरोधात BMC करणार पुनर्विचार

विद्या

26 Feb 2024 (अपडेटेड: 26 Feb 2024, 06:50 PM)

ठाकरे गटाचे माजी मंत्री आणि ईडीच्या निशाणावर असलेल्या रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. भूखंड घोटाळ्याविरोधात सादर करण्यात आलेल्या याचिकेवर आता बीएमसीकडून पुनर्विचार केला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Ravindra waikar bmc

Ravindra waikar bmc

follow google news

Ravindra Waikar : ठाकरे गटाचे माजी मंत्री रवींद्र वायकर ( Ravindra Waikar ) यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा देण्यात आला आहे. त्यांच्यावर ईडीकडून कारवाईची शक्यता असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. तसेच ते शिंदे गटात जाण्याची चर्चा सुरू असतानाच त्यांना हा दिलासा मिळाला आहे. 

हे वाचलं का?

जोगेश्वरीमधील क्लबच्या जागेचा गैरवापर आणि तिथे हॉटेल बांधताना तथ्य लपवल्याचा आरोपातून रवींद्र वायकरांना दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेकडून वायकर यांच्या अर्जावर फेरविचार करणे आवश्यक असल्याचे सांगितले होते. आरक्षित भूखंडावर हॉटेल बांधल्यानंतर वायकरांनी नवा प्रस्ताव बीएमसीला सादर केला होता, त्यामुळे महापालिकेने पुनर्विचार करण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच आता रद्दीकरण आदेश महापालिकेने मागे घेतल्यामुळे वायकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

हे ही वाचा >> 'बायकोची बदनामी करतो..', संतापलेल्या नवऱ्याचे डॉक्टरवर कोयत्याचे 18 वार

रवींद्र वायकर यांनी आरक्षित भूखंडावर हॉटेल बांधल्यानंतर वायकर यांनी नवा प्रस्ताव बीएमसीला दिला आहे. त्यामुळे महापालिकेने पुनर्विचार करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे या प्रकरणी त्यांना दिलासा मिळाला आहे. 

मुंबई महानगरपालिकेकडून 15 जून 2023 मध्ये दाखल केलेली याचिका मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता वायकरांना दिलासा मिळाला असून या प्रकरणी बीएमसीकडून पुनर्विचार करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

मुंबई महानगरपालिकेला पुनर्विचार करणार असल्याने आता ईडीकडूनही त्यांना मदत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दाखल झालेल्या फौजदारी गुन्ह्यातून सुटताना त्यांना मदत होणार आहे. 

हे ही वाचा >>प्रसिद्ध गायक पंकज उधास यांचं निधन

 

    follow whatsapp