शिंदे-ठाकरेंची मोर्चेबांधणी, पण हर्षवर्धन जाधवांमुळे होणार ‘करेक्ट कार्यक्रम’?

भागवत हिरेकर

19 Jun 2023 (अपडेटेड: 19 Jun 2023, 11:18 AM)

गेल्या लोकसभेत शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, एमआयएमचे इम्तियाज जलील आणि हर्षवर्धन जाधव यांच्यात तिहेरी आणि अत्यंत चुरशीची लढत झाली होती. यात हर्षवर्धन जाधवांना मिळालेल्या पावणे तीन लाखांपेक्षा अधिक मतांमुळे चंद्रकांत खैरेंच्या पदरात पराभव पडला.

chhatrapati sambhajinagar : harshvardhan jadhav will contest lok sabha election 2024 from bharat rashtra samiti

chhatrapati sambhajinagar : harshvardhan jadhav will contest lok sabha election 2024 from bharat rashtra samiti

follow google news

Lok Sabha Election 2024, Chhatrapati Sambhajinagar : वर्षभरावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी कंबर कसलीये… इच्छुकांच्याही पक्षश्रेष्ठीकडे येरझाऱ्या वाढल्यात… राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू आहेत. अशात इच्छुकांकडूनही बॅनर्स, होर्डिंगमधून संकेत दिले जात आहे. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातही अनेक इच्छुक असल्याचे दिसत आहे.

हे वाचलं का?

हा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे राहिला आहे. त्यामुळे फुटीनंतर मविआत ठाकरे गट, तर युतीत शिंदे गटाने या जागेवर दावा ठोकलाय. एकीकडे ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून दावे होत असताना आता संभाजीनगरात हर्षवर्धन जाधवांचे भावी खासदार म्हणून बॅनर्स झळकलेत आणि त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत इथे ‘खेला होबे’ बघायला मिळेल का अशी चर्चा झालीये. कारण 2019 च्या निवडणुकीत जाधवांमुळे शिवसेना-भाजपचे उमदेवार चंद्रकांत खैरे याचा ‘कार्यक्रम’ झाला होता. त्याचीच पुनरावृत्ती 2024 बघायला मिळू शकते, हे नाकारता येत नाही.

लोकसभा 2019 : हर्षवर्धन पाटलांमुळे झाला होता ‘गेम’

2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे चंद्रकांत खैरे हे युतीचे उमेदवार होते. त्यांच्याविरोधात काँग्रेसने आघाडीचे उमेदवार म्हणून सुभाष झाबंड यांना तिकीट दिलं होतं. पण, लढत झाली ती एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्यात. त्यावेळी एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र होते.

हेही वाचा >> Manisha Kayande: ‘आमदारकीसाठी मी उद्धव ठाकरेंच्या मागे लागली नव्हती, त्यांनीच…’, सगळंच सांगितलं!

पण, शिवस्वराज्य पक्षाचे उमेदवार म्हणून हर्षवर्धन जाधवांमुळे या मतदारसंघाचा निकालाच बदलून गेला. शिवसेनेचा बाल्लेकिल्ला असलेल्या या लोकसभा मतदारसंघात एमआयएमचे इम्तिजाय जलील विजयी झाले. यामागे हर्षवर्धन जाधवांची एन्ट्री खूप महत्त्वाची ठरली.

2019 मधील मतांचे गणित समजून घ्या…

इम्तियाज जलील (विजयी उमेदवार)
एमआयएम-वंचित बहुजन आघाडी
मिळालेली मते – 3,88,373

चंद्रकांत खैरे (पराभूत उमेदवार)
शिवसेना (युतीचे उमेदवार)
मिळालेली मते – 3,83,186

हर्षवर्धन जाधव (पराभूत उमेदवार)
शिव स्वराज्य बहुजन पक्ष
मिळालेली मते – 2,82,547

सुभाष झांबड (पराभूत उमेदवार)
कॉंग्रेस (आघाडीचे उमेदवार)
मिळालेली मते – 91,401

वरील चारही उमेदवारांना मिळालेल्या मतांच्या आकड्यांवर नजर टाकली, तर निकालाचं चित्र कसे बदलले हे तुमच्या लक्षात येईल. चंद्रक्रांत खैरे यांच्याविरोधात मतदारसंघातील मतदारांमध्ये नाराजी दिसून आली होती. त्याचाच फायदा हर्षवर्धन पाटील यांनी घेतला. हर्षवर्धन पाटील ग्रामीण भागातील मते जास्त मिळाली. त्यामुळेच खैरेंना पराभवाचा सामना करावा लागला.

हर्षवर्धन जाधव पुन्हा करेक्ट कार्यक्रम करणार?

गेल्या लोकसभेत शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, एमआयएमचे इम्तियाज जलील आणि हर्षवर्धन जाधव यांच्यात तिहेरी आणि अत्यंत चुरशीची लढत झाली होती. यात हर्षवर्धन जाधवांना मिळालेल्या पावणे तीन लाखांपेक्षा अधिक मतांमुळे चंद्रकांत खैरेंच्या पदरात पराभव पडला. या निवडणुकीत एमआयएमचे इम्तियाज जलील खासदार म्हणून संसदेत पोहोचले, असा इतिहास आहे.

हेही वाचा >> संजय राऊतांचा महाविकास आघाडीला इशारा? अजित पवारांनी दाखवला आरसा! म्हणाले, “25 वर्षे…”

याचीच पुनरावृत्ती पुन्हा होते की काय अशी चर्चा सुरू झालीये, कारण आता जाधवांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या होर्डिंग्सवरून हर्षवर्धन जाधव पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चांनी डोकं वर काढलंय.

काही दिवसांपूर्वीच हर्षवर्धन जाधवांनी हैदराबादमध्ये जाऊन तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या उपस्थितीत त्यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश केला. यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगरात अदालत रोडवर बीआरएस पक्षाचं कार्यालय सुरु केलंय.

हेही वाचा >> ‘मविआ’वरच प्रश्नचिन्ह! ठाकरेंसमोरच संजय राऊतांचा काँग्रेस, राष्ट्रवादीला इशारा!

विशेषत: जाधवांनी मतदारसंघातील शेतकऱ्यांचा कांदा थेट तेलंगाणात नेऊन विकल्यामुळे त्यांना चांगला भाव मिळाला. त्यानंतर ‘अब की बार किसान की सरकार’, असा नारा देत त्यांनी काम सुरु केले. त्यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केल्यामुळे त्यांना चांगला प्रतिसादही मिळाताना दिसतोय. त्यामुळे जाधवांनी आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केलीये असंही सांगितलं जात आहे. महाराष्ट्रात भारत राष्ट्र समिती पक्षाची बरीच चर्चा आहे. त्यांच्या सभांनाही गर्दी होताना दिसतेय. त्यामुळे जाधवांना बीआरएसने उमेदवारी दिली, तर पुन्हा शिंदे-ठाकरे, भाजपचा ‘कार्यक्रम’ होऊ शकतो.

    follow whatsapp