Maharashtra Politics : राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) सर्वेसर्वा शरद पवार, छत्रपती संभाजीनगरमधील भाजप नेते आणि माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्यासह महाराष्ट्रातील एकूण सात राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ लवकरच संपुष्टात येत असून, हे सर्व सदस्य राज्यसभेतून निवृत्त होणार आहेत. देशभरात भाजपच्या सर्वाधिक म्हणजे तब्बल 30 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ याच काळात पूर्ण होत आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान, 2026 या वर्षात देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याचबरोबर, राज्यसभेतील एकूण 71 खासदारांचा कार्यकाळ याच वर्षी समाप्त होणार आहे. यामध्ये मार्च महिन्यात 1, एप्रिलमध्ये 37, जूनमध्ये 22 तर नोव्हेंबरमध्ये 11 खासदार निवृत्त होणार आहेत.
महाराष्ट्रातील सात खासदारांचा कार्यकाळ संपणार
महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या सातही खासदारांचा कार्यकाळ 2 एप्रिल 2026 रोजी पूर्ण होणार आहे. या यादीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, डॉ. फौजिया खान, भाजपचे डॉ. भागवत कराड , धैर्यशील मोहन पाटील, काँग्रेसच्या रजनी पाटील, शिवसेना (उद्धव ठाकरे गट)च्या प्रियंका चतुर्वेदी तसेच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभा निवडणुकांच्या निमित्ताने महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात आगामी काळात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
राज्यसभेतील एकूण 245 जागांपैकी एप्रिल, जून आणि नोव्हेंबर 2026 या कालखंडात 73 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. या काळात निवृत्त होणाऱ्या खासदारांच्या यादीत केंद्रीय मंत्र्यांपासून ते अनेक ज्येष्ठ आणि प्रभावी नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे हे सर्वाधिक चर्चेत असलेले नाव असून, त्यांचा राज्यसभेतील कार्यकाळ 25 जून 2026 रोजी समाप्त होणार आहे. याच कालावधीत देशाचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा हेही राज्यसभेच्या सदस्यत्वातून निवृत्त होणार आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
मुंबई : इमारतीतून धूर अन् आग लागल्याचा संशय; पोलीस खोलीत पोहोचले पण भलतंच प्रकरण निघालं...
ADVERTISEMENT











