खासदार आणि भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर तरूणीचे लैंगिक शोषणाचे आरोप, म्हणाली आता मी...

रोहिणी यांनी चंद्रशेखर यांच्यावर शोषणाचा आरोप केला असून, इतर अनेक मुलींचंही शोषण केल्याचा दावा केला आहे. या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

24 Jun 2025 (अपडेटेड: 24 Jun 2025, 02:06 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर आरोप

point

लैंगिक शोषण केल्याचे तरूणीचे आरोप

point

कोण आहे आरोप करणारी P.hd ची विद्यार्थीनी?

Chandrashekhar Azad : भीम आर्मीचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशच्या नगीना मतदारसंघाचे खासदार चंद्रशेखर आझाद यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. इंदोरच्या पीएचडी स्कॉलर डॉ. रोहिणी घावरी यांनी नगीना चंद्रशेखर आझाद यांच्यावर गंभीर आरोप करत महिला आयोगात तक्रार दाखल केली आहे.

हे वाचलं का?

रोहिणी यांनी चंद्रशेखर यांच्यावर शोषणाचा आरोप केला असून, इतर अनेक मुलींचंही शोषण केल्याचा दावा केला आहे. या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे. रोहिणी यांनी आता चंद्रशेखर यांच्याविरोधात औपचारिक गुन्हा दाखल करून हे प्रकरण न्यायालयात नेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

रोहिणी यांचं चंद्रशेखर यांना खुलं आव्हान

रोहिणी यांनी X वर एका पोस्टद्वारे चंद्रशेखर यांना थेट आव्हान दिलं आहे. त्यांनी लिहिलं, "काल चंद्रशेखर यांनी दिल्लीत गुप्त बैठक घेऊन सर्वांसमोर कबूल केलं की आमचं नातं होतं, आम्ही एकत्र राहिलो, पण त्यांना राजकीय आणि सामाजिक नुकसान होईल असं वाटलं म्हणून मला सोडलं. आता हेच उत्तर कोर्टात देऊन दाखवा. चंद्रशेखर, मी खेळणं आहे का, वापरून फेकून दिलं? मी कुणाचीतरी मुलगी, कुणाचीतरी बहीण आणि सन्मान आहे. तुम्ही जे केलं त्याची माफी नाही, शिक्षा होईल, हे लक्षात ठेवा. आता कोर्टात भेटू."

हे ही वाचा >> मित्राचे पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याचा पतीला संशय, थेट विटेनं ठेचून केलं ठार

"चंद्रशेखर यांनी लग्नाची माहिती लपवली"

रोहिणी यांनी आरोप केला आहे की, चंद्रशेखर यांनी त्यांच्या लग्नाची माहिती त्यांच्यापासून लपवली. त्या म्हणाल्या, "आता माझ्यावर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत, म्हणून मला सत्य समोर आणावं लागतंय. आम्ही दोघं सिरीयस रिलेशनशिपमध्ये होतो, पण मला माहीत नव्हतं की ते आधीच विवाहित आहेत. आम्ही नात्यात असताना मला हे सत्य समजलं."

चंद्रशेखर यांचं उत्तर काय?

या आरोपांवर चंद्रशेखर आजाद यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, ते या प्रकरणावर आता फक्त न्यायालयातच उत्तर देतील. कारण रोहिणी यांनी कोर्टात जाण्याची घोषणा केली आहे. या प्रकरणाने राजकीय आणि सामाजिक चर्चांना उधाण आलं असून, येत्या काळात कोर्टात या प्रकरणाची काय दिशा लागते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

    follow whatsapp