Sanjay Raut on Ajit Pawar : "अजित पवार वारंवार सांगत होते की, माझ्याकडे भारतीय जनता पक्षाच्या घोटाळ्याची फाईल आहे. मी उघड करेल, असंही त्यांनी सांगितलं होतं. हे सगळं त्यांनी 15 जानेवारी रोजी सांगितलं. त्यानंतर पुढील 10 दिवसात त्यांच्या विमानाचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झालाय. हे रहस्यमय आहे. मला जस्टीस लोया यांची आठवण येते.", असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. ते दिल्लीतील पत्रकार परिषदेत बोलत होते.
ADVERTISEMENT
संजय राऊत म्हणाले, मी कोणावरती आरोप करत नाही. मात्र, या लोकांच्या मनातील शंका आहेत. अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ते गंभीर स्वरुपाचे प्रश्न आहेत. त्यांच्यासोबत ओसीडी नाही. त्यामुळे लोकांच्या मनात तशी शंका आहे. अजितदादांनी भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत प्रत्येक गोष्टीची चर्चा होतेच, असे नाही. अजित पवार त्यांच्या स्वतःच्या पक्षाचे नेते आणि प्रमुख होते. ते त्यांच्या मर्जीने भाजपसोबत गेले. त्यांना कदाचित वाटले की भाजप हा आपल्या विचारांचा पक्ष नाही. जर अजित पवारांनी फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली नसेल तर त्यांचा फडणवीसांवर विश्वास नसेल. इतर शंभर लोक म्हणतात ते खोटे आणि फडणवीस म्हणतात ते खरे हे चुकीचे आहे. आज दादा नाहीत. त्यामुळे त्यांच्या नावावर कोणतीही बिले फाडू नयेत.
अजित दादांचा पक्ष हा आता पवार, पाटलांचा पक्ष राहिलेला नाही. तो आता गोयल, पटेल, पारेख, शाह, मोदी यांचा पक्ष होण्याची शक्यता आहे. अजित पवारांचा पक्ष हा अस्सल मराठमोळ्या चेहरांचा पक्ष होता. सुरुवातीला अजितदादांचा पक्ष हा शाहांचा पक्ष होता. आता तो पटेल यांचा पक्ष होईल आणि महाराष्ट्रातील एक प्रादेशिक अस्मिता जपणारा पक्ष भारतीय जनता पक्षाने गिळून टाकला आहे, अशी टीकाही राऊत यांनी केला.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











