चाळ नावाची ‘भिकार’ वस्ती, मराठी सिनेमा चाळ संस्कृतीबद्दलचा साचेबद्धपणा कधी सोडणार?

मुंबई तक

मुंबईत लहानाचे मोठे झालेल्या मराठी व्यक्तींना चाळ संस्कृतीचं मोठं अप्रूप असतं. लालबाग, दादर, परळ, गिरगाव, सातरस्ता अशा अनेक मराठीबहुल भागांमध्ये पूर्वीच्या काळात चाळ संस्कृती चांगली प्रसिद्ध होती किंबहुना ती आजही आहे. मुंबई हे जेव्हा गिरण्यांचं शहर म्हणून ओळखलं जायचं त्यावेळपासून इथल्या चाळींनी अनेक स्थित्यंतर पाहिली आहेत. काळाच्या ओघात चाळी पडून त्या जागेवर गगनचुंबी टॉवर तयार […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबईत लहानाचे मोठे झालेल्या मराठी व्यक्तींना चाळ संस्कृतीचं मोठं अप्रूप असतं. लालबाग, दादर, परळ, गिरगाव, सातरस्ता अशा अनेक मराठीबहुल भागांमध्ये पूर्वीच्या काळात चाळ संस्कृती चांगली प्रसिद्ध होती किंबहुना ती आजही आहे. मुंबई हे जेव्हा गिरण्यांचं शहर म्हणून ओळखलं जायचं त्यावेळपासून इथल्या चाळींनी अनेक स्थित्यंतर पाहिली आहेत. काळाच्या ओघात चाळी पडून त्या जागेवर गगनचुंबी टॉवर तयार झाले. चाळीत राहणारा मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला गेला.

या राजकारणात जरी पडायचं नाही असं ठरवलं तरीही चाळ संस्कृतीचं अप्रुप तयार करण्यात मराठी सिनेमा आणि नाट्यसृष्टीने मोठी भूमिका बजावली आहे. कोणताही सिनेमा घ्या चाळ म्हणलं की सतत एकमेकांशी भांडणारे शेजारी, नेहमी कोणत्या न कोणत्या उत्सवात किंवा मग रस्त्यावर राडा घालणारी तरुण पोरं आणि चाळीतल्या मुलीचं प्रेमप्रकरण हेच चित्र आतापर्यंत मराठी सिनेमाने जगाला दाखवलं. महेश मांजरेकर यांच्या लालबाग परळ आणि आगामी नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा या सिनेमामुळे पुन्हा एकदा चाळ संस्कृतीचा विषय चर्चेत आला आहे.

लालबाग परळ या सिनेमाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. परंतू अनेकांनी या चित्रपटात महेश मांजरेकर यांनी चाळ संस्कृतीच्या उभ्या केलेल्या चित्रावर आक्षेप घेतला होता. चाळ म्हणलं की अठराविश्व दारिद्र्य दाखवलंच पाहिजे का?, चाळीत राहणारी मुलं नेहमी मारामारी आणि फक्त उत्सवांसाठी वर्गणीच मागत फिरत असतात का? मुंबईतल्या गिरण्यांना टाळी लावलेली असताना सर्वच महिलांनी देहविक्रीचा मार्ग स्विकारला असेल का असे अनेक आक्षेपही या सिनेमावर घेण्यात आले. आगामी येऊ घातलेल्या कोन नाय कोन्चा या चित्रपटाच्या ट्रेलरमधूनही महेश मांजरेकर असचं काहीसं चित्र उभं करुन दाखवत असल्याचं कळतंय.

ही बाब फक्त मराठी सिनेमाच नाही तर थोड्या फार प्रमाणात मालिका आणि नाटकांनाही लागू होते. परंतू प्रत्यक्षात चाळीत राहणाऱ्या लोकांची परिस्थिती असते तरी कशी? आजही चाळीत फक्त छोटी-मोठी कामं करणारी, उत्सवासाठी वर्गण्या काढणारी मुलंच राहतात का? तर नाही…चाळीचं चित्र हे बऱ्याचप्रमाणात बदललं आहे पण बदलली नाहीये ती मराठी सिने आणि नाट्यसृष्टीची मानसिकता.

हे वाचलं का?

    follow whatsapp