लग्नानंतर कळलं पती तर…, शेकडो प्रयत्न करूनही वाचवता आला नाही संसार!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Marriage Failed Cases : लग्नानंतर अनेक गोष्टींमध्ये तडजोड करावी लागते यात काही शंका नाही. पण ही सगळी तडजोड जेव्हा एकतर्फी होते तेव्हा नातं टॉक्सिक बनत जातं. अशा वेळी लग्न जरी तुटलं नाही तरी त्या नात्यात राहणं कठीण होऊन जातं. अशाच विवाहित महिला आहेत ज्यांनी आपल्या अयशस्वी विवाहाची कहाणी सांगितली आहे. त्यांनी लग्न टिकवूण ठेवण्यासाठी शेवटपर्यंत तडजोड केली पण, त्यांच्या पदरी काही सुख आलं नाही. (After marriage Woman found that her husband is gay She tried to save marriage but nothing Works)

‘मी त्या सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न केला ज्या त्याला आवडत होत्या…’

एका महिलेने तिच्या मोडलेल्या संसाराची कहाणी सांगितली. ती म्हणाली, ‘मी नेहमी त्याला खूश करण्याचा प्रयत्न करत होते. मला माझ्या नवऱ्यासाठी आदर्श स्त्री व्हायचं होतं. पण लग्नानंतर 5 वर्षांनी मला कळलं की मी किती मूर्ख आहे.

एका स्वार्थी माणसाला खूश करण्यासाठी मी माझा सगळा वेळ वाया घालवला. त्याची आवडीसाठी मी माझी आवड बदलली. कपड्यांपासून ते परफ्युमपर्यंत मी माझ्या इच्छेनुसार काहीही वापरले नाही. माझे छंदही त्यानुसार बदलले. मला माहिती होतं की, हे सर्व चालणार नाही पण जेव्हा तुम्हाला लग्न वाचवायचं असतं तेव्हा तुम्ही सर्वकाही करून पाहाता.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वाचा : लिफ्टमधून जाताना वाटते भीती? ‘हे’ नियम माहित असतील, तर राहाल टेन्शन फ्री

‘मी त्याचं शिवीगाळ करणंही सहन केलं’

आणखी एका महिलेने तिच्या लग्नाबद्दलची कहाणी सांगितली. ती म्हणाली, ‘पत्नी आणि तीन मुलांची आई या नात्याने मी त्याला माझ्या आयुष्यातील 7 वर्षे दिली जी मी आतापर्यंत केलेली सर्वात मूर्ख गोष्ट होती. माझा पती नेहमीच रागीट स्वभावाचा होता, पण लग्नानंतर आमच्यातलं प्रेम पूर्णपणे संपलं. तो काय बोलतो किंवा करतो यावर त्याचे नियंत्रण नव्हते.

तो सतत माझ्यावर ओरडायचा, अश्लील गोष्टी बोलायचा आणि भावनिक छळायचा. एक दिवस हे सर्व थांबेल या विचाराने मी त्याच्या वागण्याशी जुळवून घेत होते. पण तीन मुलं होऊनही काहीही बदललं नाही. त्यांच्यासमोर तो माझ्यावर ओरडायचा आणि शिवीगाळ करायचा. त्याच्या आई-वडिलांनीही त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण तरीही तो थांबला नाही. यानंतर मी हे नाते संपवण्याचा निर्णय घेतला आणि आज मी खूप आनंदी आहे.’

ADVERTISEMENT

वाचा : अजित पवारांनी काढलेल्या चिठ्ठीत निघालं ‘आदित्य’ नाव, CM एकनाथ शिंदे म्हणाले…

‘पतीच्या विवाहबाह्य संबंधाला माफ केलं’

एक महिला तिच्या मोडलेल्या लग्नाची कहाणी सांगताना म्हणाली, ‘पतीच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल समजण्यापूर्वी मी आणि माझा मुलगा आनंदी होतो. अशा वेळी जेव्हा मी या नात्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने माझी माफी मागितली आणि मला थांबायला सांगितलं. मी थांबले. पण त्यानंतरही तो सुधारला नाही, हे दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदाही घडलं.

ADVERTISEMENT

इतकंच नाही तर काही काळानंतर त्याने एवढी हिंमत वाढवली की, मी त्याच्यासोबत एकाच घरात राहत असल्याने तो मला नुकसानभरपाईसाठी धमकावू लागला. माझ्यावर शिवीगाळ केल्याचा आरोपही त्याने केला. अर्थात तो मूर्खपणा होता पण त्या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत करणाऱ्या माझ्या वकीलांची मी आभारी आहे.’

वाचा : मुलीची छेडछाड… ओढणी ओढली अन् घडला अनर्थ ; भयानक व्हिडीओ व्हायरल

लग्नानंतर समजलं की, पती तर…

एका दुसऱ्या महिलेने तिच्या लग्नाबद्दलची कहाणी सांगितली. ती म्हणाली, ‘माझा नवरा समलैंगिक होता आणि आमचं लग्न झाल्यावर मला हे कळलं. पण तो इतका छान माणूस होता की, सत्य जाणूनही मी त्याच्या प्रेमात पडले.

मला नेहमी माहित होते की काही गोष्टी कधीच शक्य होणार नाहीत आणि यामुळे मला खूप वाईट वाटलं. पण जेव्हा त्याने पुरुषांना डेट करायला सुरुवात केली तेव्हा मला वाईट वाटलं आणि मी सर्वकाही उध्वस्त केलं. मग काही वेळाने मला कळले की मी किती मूर्ख आहे. माझ्याशी सुरुवातीपासून खोटे बोलले जात होते. पण जेव्हा प्रेम तुम्हाला आंधळं करतं तेव्हा काय करावं?’

    follow whatsapp

    ADVERTISEMENT