‘…त्याच हेलिकॉप्टरने इतर शेतकऱ्यांकडेही बघा’, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यावर तोफ डागली
Uddhav Thackeray : दुबार पेरणी होऊनही अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबर संवाद साधण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी नगर जिल्ह्याचा दौरा केला. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
ADVERTISEMENT

Uddhav Thackeray : राज्यात ऐन पावसाळ्यात पावसाने दडी मारली, त्यामुळे राज्यातील अनेक शेतकरी अडचणीत सापडले. तर काही भागात दुबार पेरणीही करावी लागली तरीही पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा संकटांशी सामना करावा लागला. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अहदनगर जिल्ह्याचा दौरा केला आहे. त्यावेळी त्यांनी अनेक शेतकऱ्यांबरोबर संवाद साधत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकरावर जोरदार टीका केली आहे.
दुबार पेरणीनंतरही नुकसान
अहमदनगर जिल्ह्यात पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातच राज्य सरकार हे तिरबागडं सरकार असल्याने दुष्काळातही शेतकऱ्यांना मदत मिळू शकली नाही. नुकसान होऊनही शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या विम्याचे हक्काचे पैसे मिळाले नाहीत. तरीही हे सरकार शासन आपल्या दारी या कार्यक्रमात मश्गुल असल्याचा घणाघात त्यांनी सरकारवर केला आहे.
हे ही वाचा >> India Alliance: ‘…तर राजकारणातही अस्पृश्य म्हणूनच’, प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर तोफ डागली
विम्याचे पैसे कधी मिळणार
पाऊस झाला नसल्यामुळे राज्यातील अनेक भागात शेतीला मोठा फटका बसला आहे. ऐन हंगामातच पाऊस झाला नसल्याने पिके सगळी वाळून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. दुबार पेरणीनंतरही पाऊस झाला नसल्याने शेतीला दुहेरी फटका बसला आहे. त्यामुळे एक रुपयामध्ये विमा देणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांना विम्याचे पैसे तात्काळ द्यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आता विम्याचे पैसे शेतकऱ्यांनी कधी मिळणार असा सवालही त्यांनी केला आहे.
आराम करण्यासाठी हेलिकॉप्टरने जातात
मुख्यमंत्री आराम करण्यासाठी हेलिकॉप्टरने आपल्या शेतात जातात. मात्र राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे हे पाहण्यासाठी त्यांना वेळ नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याच हेलिकॉप्टरने इतर शेतकऱ्यांकडेही जावं असा टोला त्यांनी शिंदे यांना लगावला आहे.