Maharashtra Weather : मार्च महिन्याच्या पहिल्या दिवशी हवामानाचा महत्त्वाचा अलर्ट, उष्णतेचा पारा वाढणार तर...

मुंबई तक

Maharashtra Weather : राज्यात फेब्रुवारी महिन्यात उष्णतेचा पारा वाढलेला आहे. मार्च महिन्यात देखील पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे. राज्यात कमाल तापमान हे 2-4 अंशांनी वाढून हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. दरम्यान 1 मार्च रोजी मुख्यत्वे कोरडे, उष्ण आणि निरभ्र राहील अशी हवामान खात्याने शक्यता वर्तवली. 

ADVERTISEMENT

Mharashtra weather
Mharashtra weather
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज्यात फेब्रुवारी महिन्यात उष्णतेचा पारा वाढला

point

मार्च महिन्याची स्थिती काय?

Maharashtra Weather : राज्यात फेब्रुवारी महिन्यात उष्णतेचा पारा वाढला आहे. मार्च महिन्यात देखील पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे. राज्यात कमाल तापमान हे 2-4 अंशांनी वाढून हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. दरम्यान 1 मार्च रोजी मुख्यत्वे कोरडे, उष्ण आणि निरभ्र राहील अशी हवामान खात्याने शक्यता वर्तवली. 

हे ही वाचा : अजितदादांच्या विमान अपघाताप्रकरणी AAIB चा महत्त्वाचा अहवाल आला समोर, नेमकं काय घडलं?

कोकण :  

कोकण विभागातील मुंबई,ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात हवामान उष्ण आणि दमट कायम राहील असा अंदाज आहे. मुंबई शहराचा विचार केल्यास कमाल तापमान हे 29-32 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. तर किमान तापमान हे 23-25 अंश राहण्याची शक्यता आहे. 

पश्चिम महाराष्ट्र : 

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर येथे हवामान उष्ण आणि कोरडं राहण्याची शक्यता आहे.  तसेच पुणे शहरात देखील अशी स्थिती जाणवेल. 

मराठवाडा :  

मराठवाडा विभागातील बीड, लातूर, नांदेड, परभणी आणि धाराशिवमध्ये हवामान उष्ण आणि कोरडं राहण्याची अधिक शक्यता आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp