औरंगजेबाची कबर पाच दिवसांसाठी बंद, अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पुरातत्व खात्याचा निर्णय

मुंबई तक

औरंगाबादजवळच्या खुल्दाबादमध्ये असलेली औरंगजेबाची कबर पाच दिवसांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. औरंगजेबाच्या कबरीवरून सध्या राजकारण तापलं आहे. अशात या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. औरंगजेबाच्या कबरीची देखभाल करण्याचं काम गेल्या पाच पिढ्यांपासून एकाच घराण्याकडे आहे. त्या निसार घराण्यापैकी खादीम निरास अहमद यांचं म्हणणं आहे की औरंगजेबाच्या नावावर होणारं […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

औरंगाबादजवळच्या खुल्दाबादमध्ये असलेली औरंगजेबाची कबर पाच दिवसांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. औरंगजेबाच्या कबरीवरून सध्या राजकारण तापलं आहे. अशात या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

औरंगजेबाच्या कबरीची देखभाल करण्याचं काम गेल्या पाच पिढ्यांपासून एकाच घराण्याकडे आहे. त्या निसार घराण्यापैकी खादीम निरास अहमद यांचं म्हणणं आहे की औरंगजेबाच्या नावावर होणारं राजकारण योग्य नाही. औरंगजेबाने ५० वर्षे भारतावर राज्य केलं. आपल्या आयुष्यात टोप्या शिवून आणि कुराणाचंही लेखन त्याने केलं आहे. जनतेचे पैसे औरंगजेबाने वापरले नाहीत. टोप्या विकून आणि इतर कामं करून जे पैसे मिळतील त्यात ते आयुष्याची गुजराण करत होते.

औरंगजेबाने त्याच्या मुलाच्या नावे जे मृत्यूपत्र लिहून ठेवलं होतं, त्यात हे स्पष्ट केलं होतं की जे पैसे मी माझ्या मेहनतीने मिळवले आहेत त्याचा उपयोग माझी कबर बांधण्यासाठी करावा. औरंगजेबाच्या कबरीवरून काहीही कारण नसताना राजकारण सुरू आहे असं या निसार कुटुंबाचं म्हणणं आहे.

औरंगजेबाच्या कबरीवरून जो वाद निर्माण झाला त्यानंतर औरंगाबादमधल्या खुल्दाबाद या ठिकाणी असलेल्या औरंगजेबाच्या कबरीजवळ सात ते आठ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पुरातत्व विभाग आणि पोलीस विभागातर्फे हा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. देशात औरंगजेबाच्या कबरीवर वातावरण तापलं आहे. अशात या कबरीची तोडफोड होण्याची भीती आहे. त्याच अनुषंगाने हा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अशात आता ही कबर पाच दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Aurangabad : औरंगजेबाच्या कबरीजवळ पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, ‘हे’ आहे कारण

काय आहे प्रकरण?

१२ मे रोजी एमआयमचे तेलंगणातले आमदार अकबरूद्दीन ओवेसी यांनी आणि खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं. त्यानंतर शिवसेना नेते आणि भाजपकडून तिखट प्रतिक्रिया उमटल्या. छत्रपती संभाजीराजेंना औरंगजेबाने अत्यंत हाल हाल करून मारलं. अत्यंत क्रूर छळ करून औरंगजेबाने छत्रपती संभाजीराजेंना ठार केलं. अशा क्रूर बादशहाच्या कबरीसमोर कुणी नतमस्तक होतं का? असाही प्रश्न विचारला गेला.

एवढंच नाही तर यावरून देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर घणाघाती टीकाही केली. अकबरूद्दीन ओवेसी आणि इम्तियाज जलील यांच्यावर कारवाई का गेली नाही असा सवालही त्यांनी विचारला.

मुघल साम्राज्यातला शेवटचा बादशहा औरंगजेबाचा मृत्यू १७०७ मध्ये अहमदनगर या ठिकाणी झाला. त्याचा मुलगा आझम शाह आणि मुलगी झीनत ऊननिस्सा यांनी त्याचा दफनविधी खुल्दाबाद या ठिकाणी केला. हे ठिकाण औरंगाबाद शहरापासून साधारण २२ किलोमीटर अंतरावर आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp