Aurangabad आणि उस्मानाबाद ही नावं लावावीच लागणार, कसं ते समजून घ्या!

मुंबई तक

The names Aurangabad and Osmanabad will also remain: मुंबई: केंद्रातील मोदी सरकारने (Modi Govt) आज (24 फेब्रुवारी) राज्यातील औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबाद (Osmanabad) या दोन शहरांची नावं बदलण्याचा प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या दोन्ही शहरांची नावं बदलली जावीत अशी अनेक वर्ष शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) या दोन पक्षांची मागणी होती. अखेर आता औरंगाबादचं […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

The names Aurangabad and Osmanabad will also remain: मुंबई: केंद्रातील मोदी सरकारने (Modi Govt) आज (24 फेब्रुवारी) राज्यातील औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबाद (Osmanabad) या दोन शहरांची नावं बदलण्याचा प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या दोन्ही शहरांची नावं बदलली जावीत अशी अनेक वर्ष शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) या दोन पक्षांची मागणी होती. अखेर आता औरंगाबादचं नाव हे छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) तर उस्मानाबादचं नाव हे धाराशिव (Dharashiv) असणार आहे. ज्याबाबतचा शासन आदेश जारी झाला आहे. मात्र, असं असलं तरी औरंगाबाद आणि उस्मानाबाद ही दोन नावं तूर्तास तरी कायम राहणार आहेत. आता तुम्ही म्हणाल की, हे कसं शक्य आहे? तर तेच आम्ही आपल्याला उलगडून सांगणार आहोत. (chhatrapati sambhajinagar and dharashiv new name but the names aurangabad and osmanabad are forever how to understand it)

औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव नामकरण करण्यात आल्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी राज्यभरात जल्लोष सुरू केला आहे. तर दुसरीकडे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मात्र औरंगाबादच्या नामकरणाला विरोध दर्शवला आहे. तसेच भाजपने केलेल्या नामकरणाला विरोध करण्यासाठी मोर्चाचं देखील आवाहन केलं आहे.

आता औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नाव बदललं जाणार यावर केंद्र सरकारकडून शिक्कामोर्तब झालं आहे. पण असं असलं तरीही ही दोन्ही नावं सध्या तरी कायम राहणार आहेत. ते कसं हेच आपण आता समजून घेऊया.

मोठी बातमी: Aurangabad शहराचं नाव यापुढे छत्रपती संभाजीनगर, केंद्र सरकारची मंजुरी

हे वाचलं का?

    follow whatsapp