एकनाथ शिंदेंच्या वर्मावर पुन्हा बोट; ठाण्यातच झळकले श्रीखंडाचे बॅनर

मुंबई तक

नागपूरच्या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) राजीनाम्याची मागणी केली गेली. त्यामागचं कारण होतं नागपुरातील एनआयटी (NIT) भूखंड वाटपाचं प्रकरण. विरोधकांनी शिंदेंना यावरून कोंडीत पकडलं होतं. हे प्रकरण अजूनही शिंदेंची पाठ सोडताना दिसत नाहीये. कारण ठाण्यात याच प्रकरणावरून बॅनर झळकलेत. या बॅनरच्या माध्यमातून शिंदेंच्या वर्मावर बोट विरोधकांनी ठेवल्याची चर्चा जोरात रंगलीये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

नागपूरच्या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) राजीनाम्याची मागणी केली गेली. त्यामागचं कारण होतं नागपुरातील एनआयटी (NIT) भूखंड वाटपाचं प्रकरण. विरोधकांनी शिंदेंना यावरून कोंडीत पकडलं होतं. हे प्रकरण अजूनही शिंदेंची पाठ सोडताना दिसत नाहीये. कारण ठाण्यात याच प्रकरणावरून बॅनर झळकलेत. या बॅनरच्या माध्यमातून शिंदेंच्या वर्मावर बोट विरोधकांनी ठेवल्याची चर्चा जोरात रंगलीये.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शहरातच मोठे बॅनर लावण्यात आलेत. ‘खाऊन खाऊन 50 खोके, माजलेत बोके, माजलेत बोके’, ‘भूखंडाचे श्रीखंड ठाणेकरांना वाटणार का?’, अशा घोषणा असलेले हे बॅनर झळकल्यानंतर नागपूरमधील भूखंडाचं प्रकरण चर्चेत आलं आहे.

विरोधकांनी ज्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदेंना घेरलं होतं, तेच मुद्दे आता ठाणे शहराच्या राजकारणात गाजणार असल्याचे संकेत यातून मिळू लागले आहेत. ठाणे शहरातील काही महत्त्वाच्या चौकांमध्ये हे बॅनर झळकल्यानंतर मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.

Eknath Shinde: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कोर्टाचा दणका, ‘ते’ भूखंड पडणार महागात?

हे वाचलं का?

    follow whatsapp