Ajit Pawar Amol Kolhe : “हिंमत उरली नाही का?”; कोल्हेंचा अजित पवारांवर पहिला वार

भागवत हिरेकर

Ajit Pawar Amol kolhe news : शिरूर लोकसभा मतदारसंघातून पराभव करण्याचा निर्धार अजित पवारांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर आता अमोल कोल्हेंनी पहिल्यांदा हल्ला चढवत मोदी सरकारला सुनावण्याचं चॅलेंज दिलं आहे.

ADVERTISEMENT

amol kolhe attacks on ajit pawar over onion export ban
amol kolhe attacks on ajit pawar over onion export ban
social share
google news

Amol Kolhe Ajit Pawar Shirur Lok sabha Constituency election 2024 : शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हेंना पराभूत करण्याचा निर्धार अजित पवारांनी केला. त्यांनी दिलेल्या आव्हानानंतर अमोल कोल्हेंनी पहिल्यांदाच पलटवार केला. पुण्यातील खेड तालुक्यात शेतकरी आक्रोश मोर्चाची सभा झाली. यावेळी बोलताना अमोल कोल्हेंनी अजित पवारांच्या हिंमतीवरच प्रश्न उपस्थित केला.

अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचा शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. आक्रोश मोर्चाच्या पहिल्याच दिवशी खासदार कोल्हेंनी अजित पवारांवर बाण डागले.

बावनकुळेंच्या विधानावरून भाजपवर हल्ला

अमोल कोल्हे म्हणाले, “महाविकास आघाडीच्या शेतकरी आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून जेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले जात आहेत; तेव्हा लय जणांच्या पोटात मळमळायला लागलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात की, या शेतकरी आक्रोश मोर्चाने काहीच होणार नाही. भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो. बुरखा आपल्या माणसाने फाडला तर जास्त चांगला असतो. त्याच प्रकारे भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी त्यांचा पक्ष हा शेतकरी विरोधी आहे हे जनतेसमोर आणले. त्यांना फक्त खाणाऱ्यांची काळजी आहे.”

लाचार म्हणत अजित पवारांना उलट सवाल

भाजपसोबत सत्तेत जाण्याचे कारण सांगताना अजित पवार सतत विकासासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगतात. याच मुद्द्यावर बोट ठेवत अमोल कोल्हेंनी अजित पवारांना उलट सवाल केला आहे. अजित पवार गटाला लाचार संबोधत कोल्हेंनी घेरलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp