Maharashtra Politics : बंडानंतर छगन भुजबळांचा शरद पवार, जयंत पाटलांवर घणाघात
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर दोन्ही गटांनी शक्तिप्रदर्शन सुरू केलं आहे. छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर घणाघाती हल्ला केला.
ADVERTISEMENT

Maharashtra Politics, Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर दोन्ही गटांनी शक्तिप्रदर्शन सुरू केलं आहे. अजित पवार गटाने राष्ट्रवादीवर दावा सांगितला असून, पार पडलेल्या मेळाव्यात छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर घणाघाती हल्ला केला.
छगन भुजबळ म्हणाले, “40 पेक्षा आमदार इथे उपस्थित आहेत. काही ट्रॅफिकमध्ये अडकले आहेत. काही आजारी आहेत आणि काही परदेशात आहेत. या सगळ्यांचे प्रतिज्ञापत्र आहेत. हे खरं आहे की, लोक म्हणताहेत की तुमच्यावर कारवाई होईल. शरद पवारांनंतर मी सुद्धा 57-58 वर्षांपासून काम करतोय. हे सगळे ज्येष्ठ आहेत. नियमाच्या बाहेर जाऊन आम्ही काम कसं करू? कायदे आम्हालाही कळतात. त्यामुळे कारवाईबद्दल जे बोललं जातंय त्याचाच विचार करूनच पुढचं पाऊल टाकलेलं आहे.”
आम्ही विचार करून हे केलंय
“सकाळी उठलो आणि मंत्रिपदाची शपथ घेऊ असं झालेलं नाही. काय प्रक्रिया, सर्वोच्च न्यायालयाचा काय निकाल आहे, या सगळ्यांचा विचार करूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हे पाऊल उचलेलं आहे. कार्यकर्तेही आमच्यासोबत आहेत. येत्या काही दिवसांत काही नियुक्त्या होतील”, असं भुजबळ म्हणाले.
वाचा >> ‘प्रफुल पटेलांना ‘हा’ अधिकारच नाही’, सुप्रिया सुळेंनी सांगितली पक्षाची घटना
“मुंबईतील बैठकीत अजित पवारांनी सांगितलं की, मुंबईचे अध्यक्ष नेमले नाहीत. महिला अध्यक्ष नेमत नाही आहात. निवडणुका जवळ आल्या, काम कसं करायचं. पवार साहेबांनी सांगून सुद्धा तिथले कारभारी नेमणुकाच करतच नव्हते. दोन-चार महिने सांगूनही नेमणुका केल्या नाही. काम कसं करणार?”,