छत्रपती संभाजीनगर : पोह्यात मीठ जास्त पडल्याचं सांगितलं, अन्..भयंकर घडलं!
Chhatrapati Sambhajinagar Crime News : पोह्यात मीठ जास्त असल्याचे सांगितल्याच्या कारणावरून रिक्षाचालकावर तव्याने आणि दगडाने जीवघेणा हल्ला करण्यात आला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
छत्रपती संभाजीनगर : ग्राहकाने पोह्यात मीठ जास्त पडल्याचं सांगितलं,
अन् स्टॉल चालकाने...
Chhatrapati Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगरच्या सिडको परिसरातील सुमनांजली हॉस्पिटलजवळ पोह्यात मीठ जास्त झाल्याचे सांगणाऱ्या एका रिक्षाचालकावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी एका मुख्य आरोपीला अटक केली असून, एका अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहात पाठवले आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पोह्याची गाडी चालवणाऱ्या आरोपींनी ग्राहकावर केलेल्या या अमानवी कृत्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
हेही वाचा : ऑफिसमध्येच मर्डर, सहकाऱ्याने क्रूरपणे संपवलं; निष्पाप तरुणीसोबत काय घडलं?
पोह्यात मीठ जास्त पडल्याचं सांगताच डोक्यात तवा घातला
मिळालेल्या माहितीनुसार, जखमी रिक्षाचालक विजय प्रल्हाद चव्हाण (वय 23, रा. आनंदनगर, गारखेडा) हे 2 जून रोजी मध्यरात्री अडीच ते तीनच्या दरम्यान आपली रिक्षा उभी करून आरोपी अक्षय शिंगारे याच्या पोह्याच्या गाडीवर नाष्त्यासाठी गेले होते. त्यांनी पोहे खाल्ल्यानंतर त्यामध्ये मीठ जास्त असल्याचे अक्षयला सांगितले. आपल्या पदार्थातील त्रुटी सांगितलेली अक्षयला सहन झाली नाही आणि रागाच्या भरात त्याने थेट आपल्या हातातील हँडल असलेल्या लोखंडी तव्याने विजय यांच्या डोक्यात जोरात प्रहार केला.
हेही वाचा : Monsoon Update: 10 जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस बरसणार.. मान्सूनची दमदार हजेरी, थोड्याच वेळात कोसळधार!









