Manoj Jarange : “…तोपर्यंत जरांगे पाटलांनी थांबलं पाहिजे”, CM शिंदेंची विनंती

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Eknath Shinde, chief minister of maharashtra appeal to manoj jarange to stop mumbai march
Eknath Shinde, chief minister of maharashtra appeal to manoj jarange to stop mumbai march
social share
google news

Eknath Shinde Manoj Jarange Mumbai March : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं अन्यथा कायम स्वरूपी टिकेल असं आरक्षण द्यावं अशी मागणी मनोज जरांगे यांची आहे. या मागणीसाठी जरांगे आता मुंबईत उपोषण करणार आहे. त्यासाठी ते पायी मुंबईकडे येत आहेत. त्यांच्या पदयात्रेचा दुसरा दिवस असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे यांना विनंती केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई महापालिकेकडून राबवण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मनोज जरांगेंची मागणी आणि मराठा आरक्षणावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली.

मनोज जरांगेंच्या पदयात्रेबद्दल मुख्यमंत्री शिंदे म्हणाले…

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “मराठा समाजाबद्दल राज्य सरकार सकारात्मक आहे. जरांगे पाटील यांच्या ज्या ज्या सूचना आल्या, त्याप्रमाणे कुणबी दाखले देण्याचे काम सुरू आहे. हजारो-लाखो लोकांना कुणबी असल्याच्या नोंदी मिळत नव्हत्या, त्या लोकांना प्रमाणपत्र दिली गेली आहेत.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> “…तर भाजपसोबत आम्ही तुम्हालाही गाडू”, आंबेडकर ‘मविआ’वर कडाडले

“तेलंगणा, हैदराबाद येथील जुने दस्ताऐवज आहेत. ते ऊर्दू, फारसी, मोडी लिपीतील कागदपत्रे आहेत. त्यासाठी लोक नियुक्त करण्यात आले आहेत. तेही काम वेगात सुरू आहे. शिंदे समिती काम करत आहे”, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाचा निर्णय -शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “कुणबी नोंदी देण्याचं काम सुरू आहे. दुसरीकडे मागासवर्गीय आयोग त्याचं काम करत आहे. मराठा समाज मागास कसा आहे, यावरच जवळपास दीड लाख लोक तीन शिफ्टमध्ये काम करत आहेत. त्यांचा इम्पेरिकल डेटा गोळा करत आहेत.”

ADVERTISEMENT

“मागासवर्ग आयोगाने रिपोर्ट तयार केल्यानंतर मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण देण्यासंदर्भात फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे”, असेही शिंदे यांनी सांगितले.

“मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावला किंबहुना इतर समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला टिकणार आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे”, असे भाष्य शिंदे यांनी केले.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> भाजपला ‘या’ 129 जागांची चिंता! मोदी पुन्हा सत्तेत कसे येणार?

ते पुढे म्हणाले की, “खरं म्हणजे आंदोलकांनी सरकार सकारात्मक असेल, तर सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे. त्यांच्या अनेक सूचना सरकारने मान्य केल्या आहेत. त्यामुळे मला वाटतं हे आंदोलन थांबलं पाहिजे, टाळलं पाहिजे. यामुळे जनतेला त्रास होणार आहे.”

माझं आवाहन आहे. विनंती आहे. सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटिशनवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे एक खिडकी खुली झाली आहे. मला खात्री आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळेल, तोपर्यंत जरांगे पाटील यांनी थांबलं पाहिजे. ही सर्व जनतेची आणि सरकारची भावना आहे”, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT