कॉकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील मोर्चातील कॅमेरा पलिकडच्या गोष्टी

मुंबई तक

cockroach janata party jantar mantar protest : शिक्षण क्षेत्रातील पेपरफुटी आणि बेरोजगारीच्या प्रश्नावरून तरुणांच्या मनात मोठी अस्वस्थता आहे, हे या आंदोलनाद्वारे स्पष्ट झाले. काही उच्चभ्रू वर्गातील तरुणही हे आंदोलन काय आहे आणि तिथे नेमके काय घडते, हे पाहण्यासाठी कुतूहलापोटी तिथे आले होते.

ADVERTISEMENT

 cockroach janata party jantar mantar protest
cockroach janata party jantar mantar protest
google news

बातम्या हायलाइट

point

कॉकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील मोर्चातील कॅमेरा पलिकडच्या गोष्टी

point

डिजिटल कंटेंट क्रिएटर्स आणि युट्युबर्सची मोठी गर्दी

cockroach janata party jantar mantar protest :  नवी दिल्लीतील जंतर-मंतरवर नुकत्याच पार पडलेल्या 'कॉक्रोच जनता पक्षा'च्या आंदोलनानंतर, या मोर्चाच्या प्रत्यक्ष अनुभवाबाबत सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 'मुंबई तक'च्या प्रतिनिधींनी पत्रकार म्हणून तिथे केलेल्या निरीक्षणांमधून या आंदोलनाचे काही वेगळे पैलू समोर आले आहेत. या मोर्चात सहभागी झालेली गर्दी केवळ सोशल मीडियापुरती मर्यादित नसून, प्रत्यक्ष जमिनावरही त्याचा प्रभाव होता, हे यातून स्पष्ट झाले आहे. जरी सोशल मीडियावर करोडो फॉलोअर्स असले, तरी प्रत्यक्ष आंदोलनात सुमारे दोन हजार तरुण उपस्थित होते. यात केवळ दिल्लीतीलच नव्हे, तर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरियाणासारख्या विविध राज्यांतील तरुणांचा समावेश होता.

हेही वाचा : ‘त्या’ भव्य-दिव्य सोहळ्याला एकनाथ शिंदेंना बोलवायला विसरले की डावललं? , राजकारणाच्या नव्या डावाने कोणाची विकेट?

आंदोलनात कोणत्या संघटनांचा सहभाग?

या आंदोलनात एसएफआय (SFI), AISA आणि जेएनयू (JNU) मधील विद्यार्थी संघटनांनी सक्रीय सहभाग घेतला होता. जरी काही क्षणी या संघटना आणि 'कॉक्रोच जनता पक्षा'चे (CJP) समर्थक यांच्यात समन्वयाची कमतरता जाणवत असली, तरी शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी आणि बेरोजगारी या समान उद्देशासाठी ते रस्त्यावर उतरले होते. आंदोलनादरम्यान काही गटांनी भारतविरोधी घोषणांचा आरोप करत आंदोलकांना डिवचण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे काही ठिकाणी बाचाबाचीचे प्रसंग घडले. मात्र, दिल्ली पोलिसांनी या सर्व परिस्थितीवर अत्यंत संयमाने नियंत्रण ठेवले आणि कुठलाही अनुचित प्रकार टाळला.

हेही वाचा : समजून घ्याः INDIA आघाडीचे नेते भेटले, पण हातातून 51 खासदार निसटले?

हे वाचलं का?