Ram Mandir : “बाळासाहेबांनी जंगलराज पेटवले असते”, मोदी-शाहांना ठाकरेंचे सवाल
Uddhav Thackeray on Ram lalla pran pratishtha : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी उद्धव ठाकरेंनी मोदी-शाहांना विचारले सवाल. काय म्हणाले?
ADVERTISEMENT

Shiv Sena UBT Balasaheb Thackeray Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लांची २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा झाली. राम मंदिराच्या मुद्दा देशाच्या राजकारणात कायम फिरत राहिला. प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने हा विषय पुन्हा चर्चेत आहे. भाजप राम मंदिराचा मुद्दा राजकीय लाभासाठी वापर असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. आता शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पंतप्रधान मोदींना काही सवाल केले आहेत.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सामनात अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. ‘बाळासाहेब असते तर जंगलराज पेटवले असते!’, या मथळ्याखाली लिहिलेल्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजपवर बाण डागण्यात आले आहेत.
मोदी-शाहांवर टीकास्त्र; अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे
– “संपूर्ण देश राममय झाला असताना हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन आज साजरा होत आहे. हा मंगल योग आहे. प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा अयोध्येत पार पडला. श्रीरामांचा जन्म अयोध्येतच झाला व अयोध्या रामाचीच हे ठासून सांगणाऱ्या व त्यासाठी उसळलेल्या आंदोलनात संघर्षाच्या समिधा टाकणाऱ्या नेत्यांत शिवसेनाप्रमुखांचे नाव सर्वोच्च आहे. भारतीय जनता पक्षाच्या सध्याच्या नेतृत्वास याची कृतज्ञता नसली तरी भगवान श्रीरामाने मंदिर प्रवेशासाठी संकल्प योजला तो 22 जानेवारीस म्हणजे शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिवसाच्या पूर्वसंध्येस. हा योगायोगाचा अपूर्व संगम आहे.”
हेही वाचा >> “आपल्याला आज ‘श्रीमंत योगी’ मिळालाय..” महाराष्ट्रातील ‘या’ महाराजांकडून मोदींची शिवरायांसोबत तुलना!
– “अयोध्येतील श्रीरामावर स्वर्गस्थ शिवसेनाप्रमुखांनी फुले उधळली असतील. देश आज राममय झाला तो एका राजकीय रचनेचादेखील भाग आहे. पण देशात रामराज्य आले आहे काय? श्रीरामांना घर मिळाले, पण देशातील लाखो लोक बेघर आणि उपाशी आहेत. पंतप्रधान मोदी यांनी अयोध्येत जाऊन श्रीरामांसाठी उपवास धरला, पण देशातील कोट्यवधी जनतेची उपासमार दूर व्हावी यासाठी ते उपवास करणार आहेत काय?”