Maharashtra Weather : जळगाव, जालना, बीडमध्ये वादळ घोंघावणार! कोकण गोव्यासह 'या' भागात पावसाच्या सरी कोसळणार

मुंबई तक

Maharashtra Weather Today : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचं आगमन झालं आहे. वाशिम, परभणी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारा पडल्या आहेत.

ADVERTISEMENT

Maharashtra Weather Today (फोटो- GROK AI)
Maharashtra Weather Today (फोटो- GROK AI)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कोणत्या जिल्ह्यात वाहणार वादळी वारे?

point

या जिल्ह्यात कोसळणार पावसाच्या हलक्या सरी

point

महाराष्ट्रातील आजच्या हवामानाबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती

Maharashtra Weather Today : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचं आगमन झालं आहे. वाशिम, परभणी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारा पडल्या आहेत. काल सोमवारी 4 मे रोजी पालघर, ठाणे, मुंबई, रायगडमध्ये तुरळक ठिकाणी विजाच्या कडकडाटासह वादळे,  हलका ते मध्यम पाऊस, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास) वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती.

र रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, कोल्हापूर घाट परिसर,  सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज बांधण्यात आला होता. अशातच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये आज 6 मे 2025 रोजी हवामानाची स्थिती काय असणार आहे, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती. 

हे ही वाचा >> IPL 2025: अनेकांना मराठी वाटत असलेल्या वैभव सूर्यवंशीचं PM मोदींनीही केलं तोंडभरून कौतुक!

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर, जळगाव, छत्रपती संभाजी नगर, जालना आणि बीडमध्ये वादळ घोंघावू शकतं. तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. पालघर, ठाणे, मुंबई, रायगडमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाटयाचा वारा (30-40 किमी प्रतितास वेगाने) वाहण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट परिसर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिवमध्येही पावसाच्या हलक्या सरी कोसळू शकतात. धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट परिसर,  सातारा, सातारा घाट परिसर, छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळमध्ये 40-50 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहू शकतात. तर अकोला, बुलढाणा, वाशिमसाठी हवामान विभागाने कोणताही इशारा दिलेला नाही. 

हे ही वाचा >> पुणे हादरलं! कोंढव्यामध्ये चीड आणणारा प्रकार, 9 वर्षाच्या मुलीवर स्वच्छतागृहात अत्याचार, आरोपी...

हे वाचलं का?

    follow whatsapp