'चौकीदार जबाबदार, सिंधूचं पाणी तर...' स्वामी अविमुक्तेश्वरानंदांचा थेट PM मोदींवर हल्ला

मुंबई तक

पहलगाममधील भ्याड हल्ल्यावर सोशल मीडियावरील मोठमोठ्या लोकांचे विधान व्हायरल होत आहेत. यादरम्यान, सोशल मीडियावर यासंबंधीचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जगद्गुरू शंकराचार्य ज्योतिषपीठाधिश्वर स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी विधान केल्याचे दिसून आले आहे.

ADVERTISEMENT

पहलगाम हल्ल्यावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांचं मोठं विधान
पहलगाम हल्ल्यावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांचं मोठं विधान
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पहलगाम हल्ल्यावरील लोकांच्या सोशल मीडियावरील प्रतिक्रिया

point

पहलगाम हल्ल्यावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांचं विधान

point

काय म्हणाले स्वामी अविमुक्तेश्वरानंद?

Swami Avimukteshwarananda on Pahalgam Attack: 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखली जाणारी पहलगामची सुंदर दरी त्या दिवशी रक्ताने माखली होती. दहशतवाद्यांनी तिथे आलेल्या पर्यटकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारले होते आणि नंतर त्यांच्यावर काही विचार न करता गोळ्या झाडल्या. या घटनेनंतरच भारत सरकारने सुद्धा कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या भ्याड हल्ल्यावर सोशल मीडियावरील मोठमोठ्या लोकांचे विधान व्हायरल होत आहेत. काहींच्या मते, सुरक्षा व्यवस्थेला दोषी ठरवले तर काहींनी सरकारकडून लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

यादरम्यान, सोशल मीडियावर यासंबंधीचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जगद्गुरू शंकराचार्य ज्योतिषपीठाधिश्वर स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी विधान केल्याचे दिसून आले आहे. स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी केलेल्या मोठ्या विधानामुळे ते चर्चेत आले आहेत. तसेच, 26 एप्रिल रोजी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनीही एक वेगळे विधान केले होते आणि यामुळे ते देखील सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.

स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची सरकारवर टीका 

स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी मोदी सरकारवर टीका करताना म्हटले की, "आमच्या घरात कोणतीही घटना घडली तर आपण सर्वात आधी पहारेकऱ्याला जबाबदार ठरवतो आणि त्यालाच विचारतो की ती घटना कशी घडली. त्याचप्रमाणे, हल्ले रोखण्याची जबाबदारीही सुरक्षा विभागावर होती. मात्र, या हल्ल्यानंतर, पहारेकऱ्यांची भूमिका काय होती?, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण त्यावेळी तिथे कोणताही संघर्ष किंवा युद्ध झालं नाही आणि हल्लेखोरांना थांबवण्याचा कोणताही प्रयत्न झाला नाही. हल्लेखोर आले, हल्ला केला आणि आरामात परत गेले."

हे ही वाचा: पहलगाम हल्ल्याचा दुसरा Video आला समोर, पाहा नराधमांनी कसा केला पयर्टकांवर हल्ला!

हे वाचलं का?

    follow whatsapp