जम्मू-काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर भ्याड दहशतवादी हल्ला,10 जणांचा मृत्यू!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

हल्ला झालेल्या भाविकांसोबत नेमकं काय घडलं?

point

दहशतवादी हल्ल्यात 10 भाविकांचा मृत्यू, 33 जण जखमी

point

वरिष्ठ पोलीस अधीक्षक काय म्हणाले?

Jammu & Kashmir Terrorist Attack : एकीकडे राजधानी दिल्लीत रविवारी (9 जून)  मोदी सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला, तर दुसरीकडे जम्मू-काश्मीरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील शिवखोडी गुंफा तीर्थक्षेत्रातून कटरा येथे परतणाऱ्या भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसवर संशयित दहशतवाद्यांनी गोळीबार केला. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. दहशतवाद्यांचा हाच गट राजौरी, पुंछ आणि रियासीच्या वरच्या भागांमध्ये लपून बसला आहे. (terrorist attack on bus of devotees in Jammu and Kashmir 10 people died more than 30 are injured)

घटनास्थळावरील दृश्यांमध्ये स्थानिक लोक बचाव कार्यात मदत करत असल्याचे दिसून आले. तसेच रुग्णवाहिका तातडीने मदतीसाठी रस्त्याच्या कडेला येऊन उभ्या आहेत.

हेही वाचा: PM Modi new cabinet minister list 2024 : असे आहे मोदींचे मंत्रिमंडळ, वाचा संपूर्ण यादी

हल्ला झालेल्या भाविकांसोबत नेमकं काय घडलं?

जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी 6.10 च्या सुमारास राजौरी जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या रियासी जिल्ह्यातील पौनी भागात दहशतवाद्यांनी शिवखोडीहून कटरा येथे जाणाऱ्या प्रवासी बसला टार्गेट केले. यावेळी गोळी लागल्याने बस चालकाचे नियंत्रण सुटले, त्यामुळे बस दरीत कोसळली. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी रात्री 8.10 वाजेपर्यंत सर्व प्रवाशांना बाहेर काढले.
 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दहशतवादी हल्ल्यात 10 भाविकांचा मृत्यू, 33 जण जखमी

रियासी पोलीस उपायुक्त अधिकाऱ्यांनी लोकांच्या बचाव प्रक्रियेवर देखरेख केली. यावेळी 10 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली. तर 33 जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात पाठवण्यात आले, ज्यामध्ये 13 जणांना जिल्हा मुख्यालय रुग्णालय रियासी येथे तर, 5 जणांना सीएचसी त्रेयाथ आणि 15 जणांना जीएमसी जम्मूमध्ये दाखल करण्यात आले. त्याचवेळी पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफने संयुक्त सुरक्षा दलाची मोहीम राबवून परिसर सील करण्यात आला. हल्लेखोरांपर्यंत पोहोचण्यासाठी बहुआयामी कारवाई सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा: Modi New Cabinet : भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 'कॅबिनेट मंत्रिपद' का दिलं नाही?

वरिष्ठ पोलीस अधीक्षक काय म्हणाले?

रियासी वरिष्ठ पोलीस अधीक्षक मोहिता शर्मा यांनी सांगितले की, प्राथमिक अहवालानुसार शिवखोडीहून कटराकडे जाणाऱ्या प्रवासी बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याचे दिसते. गोळीबारामुळे बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली. या घटनेत 33 जण जखमी झाले आहेत. बचाव कार्य पूर्ण झाले आहे. प्रवाशांची अद्याप ओळख पटलेली नाही. ते स्थानिक नाहीत. शिवखोडी तीर्थक्षेत्रात सुरक्षितता वाढवण्यात आली असून परिसर सील करण्यात आला आहे. त्याचबरोबर या घटनेत 10 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

ADVERTISEMENT

अमित शाह दहशतवादी हल्ल्याबाबत काय म्हणाले?

जम्मू-काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत कॅबिनेट मंत्री अमित शहा यांनी X वर पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिले की, 'जम्मू-काश्मीरमधील रियासी येथे भाविकांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेने मला खूप दु:ख झाले आहे. लेफ्टनंट गव्हर्नर आणि डीजीपी, जम्मू-काश्मीर यांच्याशी बोलून घटनेची माहिती घेतली. या भ्याड हल्ल्यातील दोषींना सोडले जाणार नाही आणि पीडितांना न्याय मिळवून दिला जाईल. तत्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे. ईश्वर मृतांच्या कुटुंबांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो.'

ADVERTISEMENT

हेही वाचा: 23 कोटींची संपत्ती, शेअर्समध्ये करोडोंची गुंतवणूक; मोदींच्या कॅबिनेटमधील यंग मंत्री कोण?

 

मल्लिकार्जुन खरगे यांची संतापजनक प्रतिक्रिया

काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोशल मीडिया X वर जम्मू-काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत पोस्ट केली आहे. 'एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा आणि भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात किमान 10 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. 

आमच्या लोकांवरील या घृणास्पद दहशतवादी हल्ल्याचा आणि आमच्या राष्ट्रीय सुरक्षेकडे जाणीवपूर्वक केलेल्या दुर्लक्षाचा आम्ही निर्विवादपणे निषेध करतो. आम्ही पीडितांच्या कुटुंबियांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि जखमींसाठी प्रार्थना करतो. सरकारने आणि प्रशासनाने पीडितांना तातडीने मदत आणि भरपाई द्यावी.

तीन आठवड्यांपूर्वी पहलगाममध्ये पर्यटकांवर गोळीबार झाला होता आणि जम्मू-काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी घटना सुरू आहेत. मोदी (आताच्या एनडीए) सरकारने शांतता आणि सामान्य स्थिती आणण्यासाठी केलेला सर्व प्रचार पोकळ ठरत आहे. भारत दहशतवादाविरोधात एकजूट आहे.'

    follow whatsapp

    ADVERTISEMENT