Goa Stampede: लैराई देवी यात्रेत चेंगराचेंगरीमध्ये 7 भाविकांचा मृत्यू, मृतांची यादी आली समोर

मुंबई तक

गोव्यातील शिरगाव येथील लैराई देवीच्या जत्रेत घडलेल्या भीषण चेंगराचेंगरी प्रकरणासंबंधित आता नवीन वृत्त समोर आलं आहे. यामधील मृत पावलेल्या भाविकांची नावं समोर आली आहेत.

ADVERTISEMENT

लैराई देवी यात्रेत चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू झालेल्या भाविकांची यादी
लैराई देवी यात्रेत चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू झालेल्या भाविकांची यादी
google news

बातम्या हायलाइट

point

लैराई देवी यात्रेत चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू झालेल्या भाविकांची यादी

point

चेंगराचेंगरी प्रकरणात मृतांची संख्या किती?

point

लैराई देवी यात्रेतील दुर्घटनेत कोणाचा मृत्यू झाला?

Goa Stampede: गोव्यात काल रात्री घडलेल्या भीषण चेंगराचेंगरी प्रकरणासंबंधित आता नवीन वृत्त समोर आलं आहे. गोव्यातील शिरगाव येथील लैराई देवीच्या जत्रेत 6 जणांचा मृत्यू झाला असून 30 हून अधिक भाविक जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये मृतांची नावं सुद्धा समोर आली आहेत. जखमी झालेल्या भाविकांमध्ये 20 जणांची प्रकृती गंभीर आणि चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

पोलिसांच्या माहितीनुसार, पहाटे 3 वाजताच्या सुमारास ही मोठी गुर्घटना घडली. देवी लैराईच्या जत्रेत घडलेल्या या घटनेत मृत पावलेल्या भाविकांमध्ये 4 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश असल्याचं सांगितलं आहे. या दुर्घटनेत थिवी येथील तिघांचा मृत्यू झाला. 

चेंगराचेंगरीत मृत पावलेल्यांची नावं 

  1. सुर्या मयेकर (साखळी) 
  2. आदित्य कवठणकर (वय 17 वर्ष) 
  3. तनुजा कवठणकर (वय 52 वर्ष, अवचीतवाडो थिवी) 
  4. यशवंत केरकर (वय 40 वर्ष, माडेल, थिवी), 
  5. प्रतिभा कळंगुटकर (कुंभारजुवे) 
  6. सागर नंदरगे (वय 30 वर्ष, पिळगाव) 

हे ही वाचा: गोव्यात चेंगराचेंगरी, 7 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी; लइराई देवीच्या जत्रेत नेमकं काय घडलं?

अशी 6 मृतांची नावं आहे. तर आणखी एका मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार आदित्य कवठणकर, तनुजा कवठणकर  आणि यशवंत केरकर हे तिघेही मृत एकमेकांचे नातेवाईक होते. जे यात्रेसाठी आले होते. मात्र, यात्रेदरम्यान झालेल्या चेंगचेंगरीत त्यांचा मृत्यू झाला.

हे ही वाचा: 23 वर्षांची शिक्षिका 13 वर्षाच्या विद्यार्थ्यासोबत पळाली! प्रेग्नंटही झाली.. म्हणते , 'माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप आहे तो'

खरंतर, जत्रेत सहभागी होण्यासाठी गोव्यासह महाराष्ट्र आणि कर्नाटकातून मोठ्या संख्येने भाविक आले होते. गर्दीमुळे अचानक गोंधळ निर्माण झाला आणि चेंगराचेंगरी झाली. 

हे वाचलं का?