Ravindra Waikar : 'या' गोष्टींमुळे रवींद्र वायकरांनी शिंदेंच्या शिवसेनेत केला प्रवेश
Ravindra Waikar Political news : रवींद्र वायकरांना निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंच्या पक्षाला का केला जय महाराष्ट्र?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

रवींद्र वायकरांनी उद्धव ठाकरेंना का सोडलं?

एकनाथ शिंदेंच्या सेनेत प्रवेश करण्याचे कारण केले उघड

मुंबईत राजकीय समीकरणे बदलली
Ravindra Waikar Shiv Sena : आमदार रवींद्र वायकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ अखेर सोडली. 9 मार्च रोजी उद्धव ठाकरेंचे स्वागत करणारे वायकर 10 मार्च रोजी शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले. वायकरांनी ठाकरेंची सेना का सोडली याबद्दल उलटसुलट चर्चा होत आहे. पण, वायकर यांनीच शिंदेंच्या पक्षात जाण्याची कारणे सांगितली. (Why Ravindra Waikar Quits Shiv Sena Uddhav balasaheb Thackeray party)
शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यानंतर बोलताना वायकर यांनी त्यांची भूमिका मांडली. यावेळी त्यांनी पक्षांतराच्या कारणाचाही उल्लेख केला. ते काय म्हणाले वाचा...
रवींद्र वायकर यांनी काय सांगितली कारणे?
"मी गेली 50 वर्षे शिवसेनेत काम केलं आहे. 1974 ची पहिली जोगेश्वरीतील दंगल, त्यावेळेपासून बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर शिवसेनेचं पडेल ते काम केलं आहे. चार वेळा नगरसेवक, चार वेळा स्टँडिंग कमिटी, तीन वेळा आमदार हे पर्यायाने आला. पण, आता ज्यावेळी मी इथे पक्षप्रवेश करतोय त्यामागचं कारण वेगळं आहे."
हेही वाचा >> "शरद पवारांचा हात ज्याच्यावर पडतो, तो भस्म होतो", सावंतांची ठाकरेंवर अरे तुरे करत टीका
"पहिले तर कोविड होता त्यावेळी कामे झाली नव्हती. पण आता जी कामे आहेत, प्रामुख्याने आरेच्या बाबतीत पाहिलं, तर 173 कोटी रुपये मला आरेच्या रस्त्यासाठी पाहिजेत. लोकं रडत आहेत. आरेबाबत लोकं रडत आहे की, आमच्याकडे 45 किमीचे रस्ते होणे अत्यंत गरजेचं आहे. त्याचप्रमाणे रॉयल पंप सारख्या परिसरात अत्यंत उत्तम पाण्याची व्यवस्था परिपूर्ण नाही. अशावेळेला धोरणात्मक निर्णय लोकांसाठी बदलणं महत्त्वाचं असतं. अशा धोरणात्मक निर्णय बदलले नाहीत तर तिथल्या लोकांना आपण न्याय देऊ शकत नाही."