भारतातील 'इथल्या' महिला करू शकतात 4 लग्न, फिरायला आलेले पर्यटक तर...

मुंबई तक

आपल्या भारतात एकाहून अधिक लग्न करणं गैर मानलं जातं, पण भारताच्या या गावातील महिलांना 4 लग्न करण्याची परवानगी असल्याचा दावा केला जातो. नेमकी काय आहे ही प्रथा?

ADVERTISEMENT

भारतातील 'इथल्या' महिला करू शकतात 4 लग्न
भारतातील 'इथल्या' महिला करू शकतात 4 लग्न (फोटो सौजन्य: Grok AI)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भारताच्या 'या' गावातील महिला करु शकतात 4 लग्न

point

4 लग्न करण्याची नेमकी कोणती प्रथा?

point

ही प्रथा कोणत्या गावात पाळली जाते?

आपल्या भारताच्या शहरातील बऱ्याच गावांची अगदी थक्क करणारी वैशिष्ट्ये आपण पाहतो किंवा ऐकतो. आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा एका गावाबद्दल सांगणार आहोत, जिथे खूपच वेगळी आणि अनोखी प्रथा आजही पाळली जाते. खरंतर, आपल्या भारतात एकाहून अधिक लग्न करणं गैर मानलं जातं, पण भारताच्या या गावातील महिलांना 4 लग्न करण्याची परवानगी असल्याचा दावा केला जातो. नेमकी काय आहे ही प्रथा? सविस्तर जाणून घ्या. 

कोणतं गाव? 

हिमाचल प्रदेशातील सांगला शहरापासून 28 किमी दूर असलेल्या 'छितकुल'गावाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. या गावातील महिलांना 4 लग्न करण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य असल्याचं दावा केला जातो. असं करणं या गावात अजिबात गैर मानलं जात नाही. 

गावाची जुनी परंपरा

खरंतर, कोणत्या गावात महिलांना चक्क 4 लग्न करण्याची परवानगी कशी काय मिळू शकते? मात्र, तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की छितकुल गावात ही प्रथा बऱ्याच वर्षांपासून चालत आली आहे. 

महिला करतात 4 लग्नं मात्र सात फेरेही घेत नाहीत!

छितकुल गावाच्या परंपरेनुसार, तिथल्या महिला 4 लग्न करु शकतात मात्र, या गावातील लग्नांमध्ये सात फेरे घेतले जात नाहीत तर बळी दिला जातो. धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा महिलेला तिच्या एका पतीसोबत एकांतात राहायचं असल्यास तेव्हा तो पती खोलीच्या बाहेरील दरवाजावर त्याची टोपी ठेवतो जेणेकरुन दुसरा पती ते पाहून हस्तक्षेप करु शकणार नाही. 

हे ही वाचा: तब्बल 100 वर्षानंतर घडतोय एका मोठा चमत्कार, या 3 राशींना लाभणार योग, पैशांचा पडणार पाऊस 

गावाचं वैशिष्ट्य

छितकुल गावाची ही प्रथा बाकी गावांपेक्षा तर वेगळी आहेच मात्र या गावातील लोकांच्या खाण्याच्या सवयी, राहणीमान, पोशाख आणि संस्कृतीमध्ये देखील फरक असल्याचं दिसून येतं. तिथल्या लोकांचं वैशिष्ट्य म्हणजे ते अगदी कमी संसाधने किंवा उपकरणे वापरुन छान जीवन व्यतीत करतात. तेथील लोक बाहेरुन आलेल्या पाहुण्याला अगदी आपलंसं करुन घेतात. 

भारताचं शेवटचं गाव

भारताचं सर्वात शेवटचं गाव म्हटलं की उत्तराखंडमधील माणा या प्रसिद्ध गावाचं नाव घेतलं जातं. या गावाप्रमाणेच हिमाचल प्रदेशातील छितकुल हे देखील शेवटचं गाव असल्याचं सांगितलं जातं. 

हे ही वाचा: महिला पोलीस कैद्याच्या प्रेमात झाली वेडीपिसी, गरोदर होण्यासाठी जेलमध्येच केला मोठा जुगाड!

गावात जाण्याचा मार्ग

हिमाचल प्रदेशातील छितकुल गावात जाण्यासाठी बरेच मार्ग आहेत. अगदी कमी खर्चात या ठिकाणी येण्यासाठी तुम्ही HRCTC बस सेवेमार्फत प्रवास करु शकता. 

विमानाने प्रवास करायचा विचार करत असाल तर तुम्ही चंडीगढ एअरपोर्टवर पोहचून तिथून छितकुलमध्ये जाण्यासाठी टॅक्सी भाड्याने घेऊ शकता किंवा बस मार्फत देखील प्रवास करु शकता. 

रेल्वेने प्रवास करायचा असल्यास छितकुल जवळील चंडीगढ किंवा कालका रेल्वे स्टेशन उत्तम पर्याय ठरू शकता. यापैकी कोणत्याही स्टेशनवरुन तुम्ही टॅक्सी करुन शिमला आणि त्यानंतर छितकुल पर्यंत सोप्यारितीने प्रवास करु शकता. 


 

हे वाचलं का?

    follow whatsapp