YS Sharmila : मुख्यमंत्री भावाकडून नजरकैदेची भीती, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस कार्यालयातच झोपल्या

ADVERTISEMENT

आम्ही दहशतवादी आहोत की समाजविघातक शक्ती? असा सवाल शर्मिला यांनी केला आहे.
YS Sharmila Reddy camped in Congress office the whole night
social share
google news

YS Sharmila : आंध्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा वायएस शर्मिला यांनी आज विजयवाडा येथे आयोजित ‘चलो सचिवालय’ आंदोलनापूर्वी संपूर्ण रात्र काँग्रेस कार्यालयातच काढली. वायएस शर्मिला यांना भीती होती की सरकार त्यांना नजरकैदेत ठेवेल, म्हणूनच त्या रात्रभर काँग्रेस कार्यालयातच थांबल्या.

बेरोजगार युवक आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत काँग्रेसने आंध्र प्रदेशच्या जगनमोहन रेड्डी सरकारविरोधात आघाडी उघडली आहे. आंध्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा वायएस शर्मिला रेड्डी (मुख्यमंत्री जगनमोहन यांची बहीण) यांनी गुरुवारी विजयवाडा येथे 'चलो सचिवालय' आंदोलनाची हाक दिली आहे. 

या प्रदर्शनापूर्वी वायएस शर्मिला यांना सरकारकडून नजरकैदेत ठेवण्याची भीती होती. त्यापासून वाचवण्यासाठी त्यांनी संपूर्ण रात्र पक्षाच्या कार्यालयातच घालवली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वायएस शर्मिलांचा काँग्रेस कार्यालयात मुक्काम

'चलो सचिवालय' आंदोलनापूर्वी अटक केली जाऊ नये म्हणून वायएस शर्मिला या रात्री विजयवाडा येथील काँग्रेस मुख्यालयात गेल्या आणि रात्रभर तिथेच थांबल्या. प्रथम बेरोजगार युवक व विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवावेत, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

हेही वाचा >> "जरांगेंना अक्कल नाही, लोकांची...", बारसकर महाराजांचे स्फोटक आरोप

विजयवाडा येथील आंध्ररत्न भवन येथे माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, 'मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी गेल्या पाच वर्षांत तरुण, बेरोजगार आणि विद्यार्थ्यांच्या महत्त्वाच्या समस्या सोडवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत.'

ADVERTISEMENT

आम्ही दहशतवादी आहोत का? वायएस शर्मिला

त्यांनी आपल्या X (पूर्वीचे ट्विटर) खात्यावर लिहिले, 'जर आम्ही बेरोजगारांच्या वतीने आंदोलन पुकारले तर तुम्ही आम्हाला नजरकैदेत ठेवण्याचा प्रयत्न कराल का? लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार नाही का? एक महिला म्हणून मला पोलिसांपासून दूर राहावे लागले आणि नजरकैदेपासून दूर राहण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात रात्र काढावी लागली, ही लाजिरवाणी गोष्ट नाही का?"

ADVERTISEMENT

हेही वाचा >>  'शरद पवारांना मी रडताना पाहिलंय', आव्हाडांचा कंठ आला दाटून

राज्य सरकारवर निशाणा साधत त्या पुढे म्हणाल्या की, 'आम्ही दहशतवादी आहोत की समाजविघातक शक्ती? ते आम्हाला रोखण्याचा प्रयत्न करत आहेत... याचा अर्थ ते (सरकार) आम्हाला घाबरतात. ते आपली अक्षमता, सत्य लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला, आमच्या कार्यकर्त्यांना ठिकठिकाणी रोखले किंवा त्यांना बॅरिकेड्सला बांधले तरी बेरोजगारांच्या वतीने आमचा संघर्ष थांबणार नाही.'

    follow whatsapp

    ADVERTISEMENT