आप्पासाहेब धर्माधिकारींच्या ‘श्री समर्थ बैठकी’त नेमकी काय मिळते शिकवण?
आप्पासाहेब धर्माधिकारींच्या ‘श्री समर्थ बैठकी’त नेमकी काय शिकवण मिळते, त्यांच्या निरुपणाचा नेमका पाया काय आहे हेच आपण या लेखातून जाणून घेऊया.
ADVERTISEMENT

मुंबई: महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan) सोहळ्यादरम्यान 14 श्री सदस्यांचा मृत्यू झाल्याने या संपूर्ण सोहळ्यालाच गालबोट लागलं. त्यामुळे शिंदे सरकारवर (Shinde Govt) सध्या बरीच टीका केली जात आहे. असं असताना आता ज्या आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला ते बरेच चर्चेत आले आहेत. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मानणारे श्री सदस्य संपूर्ण जगभरात आहे. ‘श्री समर्थ बैठकी’च्या माध्यमातून लाखो श्री सेवक हे या सांप्रदायाशी जोडले गेले आहेत. आता अनेक जण असंही विचारत आहे की, श्री समर्थ बैठकीत अशी काय शिकवण दिली जाते की, ज्यामुळे लाखो लोक हे आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी मानतात? (what exactly is taught in appasaheb dharmadhikaris shree samarth baithak)
समर्थ बैठकीत नेमकी काय शिकवण दिली जाते आणि कोणत्या आध्यात्मिक गोष्टींचा आधार घेतला जाते हेच आपण सविस्तर जाणून घेऊया.
‘श्री समर्थ बैठकी’ची सुरुवात कशी झाली?
श्री समर्थ बैठकीची सुरुवात ही महाराष्ट्र भूषण नारायण धर्माधिकारी उर्फ नानासाहेब यांनी केली होती. नानासाहेब धर्माधिकारी यांचा मूळ व्यवसाय हा ज्योतिषशास्त्राचा होता. पण याच दरम्यान त्यांनी समर्थ रामदासांनी लिहिलेल्या दासबोध आत्मसात करुन त्याच आधारावर बैठकीला सुरुवात केली. सुरुवातील अवघ्या सात श्री सदस्य असलेल्या या बैठकीची व्याप्ती हळूहळू वाढत गेली. त्यानंतर राज्यातील अनेक जिल्ह्यात आणि नंतर देशा-परदेशात देखील बैठक सुरू झाल्या. नानासाहेबांनी सुरू केलेल्या या बैठकीची परंपरा आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी देखील कायम ठेवली. गेली अनेक वर्ष त्यांनी समर्थ बैठकीची परंपरा कायम ठेवली आहे.
श्री समर्थ बैठकीत नेमकी काय दिली जाते शिकवण?
ज्या श्री समर्थ बैठकीसाठी लाखो लोक हे वर्षानुवर्षे जातात. त्या संपूर्ण बैठकीचा पाया हा रामदास स्वामींनी रचलेल्या दासबोधावर आहे. मुळात बैठक म्हणजे काय ते आपण आणि समजून घेऊया. बैठकी ही एका मोठ्या घरात किंवा हॉलमध्ये भरवली जाते. ज्यासाठी आठवड्यातील एक वार निश्चित असतो. महिला, पुरुष आणि लहान मुलं-मुली यांच्यासाठी वेगवेगळ्या बैठका असतात. प्रोढांसाठी ज्या बैठका असतात त्यात दासबोधाच्या प्रत्येक समासावर एक व्यक्ती निरुपण करतं. बैठकीत एक उच्चासन असतं ज्यावर केवळ दोनच लोकं बसतात. एक निरुपण करणारी व्यक्ती आणि दुसरी दासबोधाच्या समासाचं वाचन करणारी. जी व्यक्ती निरुपण करते त्या व्यक्तीला संपूर्ण श्री समर्थ बैठकीत अधिकारी म्हटलं जातं.