आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय, पण गावाकडे जीव गेला
IT employee turned farmer dies after lightning : आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून शेतीकडे वळलेल्या तरुणाचा वीज पडून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे इंजिनिअरच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय
पण गावाकडे जीव गेला, नेमकं काय घडलं?
IT employee turned farmer dies after lightning :आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून शेतीमध्ये नवीन प्रयोग करण्याचा निर्णय घेतलेल्या एका तरुणाचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कुटुंबासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत तरुण आपल्या पत्नी आणि मुलासोबत शेतीची पाहणी करण्यासाठी गेला असताना ही दुर्घटना घडली.
हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात 12 तास धोक्याचे! पाऊस धिंगाणा घालणार, 14 जिल्ह्यांना अलर्ट
मृत तरुणाचे नाव होसोक्लू रोशन बालकृष्ण असे आहे. तो मूळचा मदिकेरीजवळील हेरावनाड गावातील रहिवासी होता. रोशन याने नुकतीच आयटी क्षेत्रातील नोकरी सोडली होती. त्यानंतर तो आपल्या सहकाऱ्यासोबत शेतीविषयक कामात सक्रिय झाला होता. आधुनिक कृषी उपकरणांची ओळख करून देणे आणि त्याचे मार्केटिंग करण्याचे काम तो करत होता.
हेही वाचा : पुण्याची गोष्ट : देशातील सर्वाधिक लांब उड्डाणपूल पुण्याला जोडणार, वाहतूक कोंडी सुटणार









