Pune Accident : बिल्डरपुत्राच्या बचावासाठी आमदाराचा दबाव? आरोपांवर सुनील टिंगरेंनी दिलं स्पष्टीकरण

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

pune porsche accident news mla sunil tingre reaction on allegation builder vishal agarwal son pune news
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप होतोय.
social share
google news

Mla Sunil Tingre on Pune Accident News : पुण्याच्या कल्याणीनगर भागात मद्यधुंद अवस्थेत पोर्शे कार (Pune Porsche Accident) चालवणाऱ्या अल्ववयीन मुलाने दोघांचा जीव घेतल्याची घटना रविवारी घडली होती. या घटनेवरून आता राजकारण चांगलेच तापले आहेत. त्यात या घटनेत आरोपी अल्पवयीन मुलाला वाचविण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे (MLA Sunil Tingre) यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप होतोय. या आरोपांवर आता सुनील टिंगरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. (pune porsche accident news mla sunil tingre reaction on allegation builder vishal agarwal son pune news) 

पुण्यातील या अपघाताच्या घटनेत आरोपी मुलाला वाचविण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराचा हात असल्याचा आरोप होत होता.  माहिती अधिकार कार्यकर्त्या विनीता देशमुख यांनी या प्रकरणात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांनी पोलिसांवर दबाव टाकला. तसेच पोलीस ठाण्यात अल्पवयीन आरोपीला पिझ्झा, बिर्याणी खायला लावल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पुण्याच्या या अपघाताच्या घटनेत सुनील टिंगरे यांचे नाव चर्चेत आले होते. 

हे ही वाचा : Lok Sabha : कपिल पाटलांचा 'तो' Video रोहित पवार चिडले!

पुण्यातील या अपघाताच्या घटनेत आपले नाव समोर आल्यानंतर सुनिल टिंगरे यांनी एक्सवर पोस्ट करून स्पष्टीकरण दिले आहे. नेमकं टिंगरे त्यांच्या पोस्टमध्ये काय म्हणाले आहेत. हे जाणून घेऊयात.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सुनिल टिंगरेंची पोस्ट जशीच्या तशी 

कल्याणीनगरमध्ये काल रात्री झालेल्या अपघातात दोघांचा झालेला मृत्यू ही अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. दोन्ही मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे आणि या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुण-तरुणीला न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून नक्की न्याय मिळेल, असा मला विश्वासही आहे. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी आशा बाळगतो. 

या दुर्दैवी अपघाताशी माझा दुरान्वयेही संबंध नसताना कालपासून सोशल मिडियात काही घटकांकडून माझ्याविषयी चुकीची आणि बदनामीकारक माहिती प्रसारीत करण्यात येत आहे. याबाबत सुरूवातीला दुर्लक्ष केलं परंतु विरोधकांकडून याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न होत असल्याचं लक्षात आल्याने कालच्या घटनेबाबत सविस्तर भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : HSC Results 2024: राज्यात '12वी'चा निकाल जाहीर, मुंबईचा कितवा क्रमांक?   

माझ्या मतदारसंघात मोठा अपघात झाल्याची माहिती काल पहाटे ३ च्या सुमारास माझ्या कार्यकर्त्यांनी फोन करुन दिली. तसंच माझे परिचित विशाल आगरवाल यांनीही फोन केला आणि त्यांच्या मुलाचा ॲक्सिडेंट झाल्याचं सांगितलं. त्यानुसार जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी पहाटे प्रथम घटनास्थळावर आणि नंतर येरवडा पोलिस ठाण्यात गेलो. 

ADVERTISEMENT

पोलिस ठाण्यात चौकशी केली असता पोलिस निरक्षक हे अपघातातील तरुण-तरुणींना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्याचं सांगण्यात आलं. मी त्यांना फोन केला असता 15 मिनिटात येत असल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्यानुसार ते आलेही. पोलिस स्टेशनला आल्यानंतर पीआय साहेबांनी अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्यानुसार आपण दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशा सूचना देऊन मी तिथून निघून आलो. मी पोलिसांवर कोणताही दबाव आणला नाही हे पोलिस अधिकारीही कबूल करतील, यात शंका नाही. म्हणूनच काल सकाळी ६ वाजता याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियाही झाली.

दरम्यान, या अपघातप्रकरणी मी पोलिसांवर दबाव आणल्याचा खोडसाळपणा काही घटकांकडून सोशल मिडियात केला जातोय. यामुळं माझी सार्वजनिक व राजकीय जीवनात बदनामी होण्याची शक्यता असल्याने वस्तुस्थिती याठिकाणी नमूद केली आहे.

 वास्तविक मी पहिल्यापासून ‘नाईट लाईफ’च्या विरोधात आहे आणि याबाबत वेळोवेळी आवाजही उठवला आहे. विमाननगर, कल्याणीनगर, खराडी या उच्चभ्रू भागात रात्री उशिरापर्यंत अवैधरित्या सुरु असलेले पब, बार आणि टेरेस हॉटेल तसंच दारु विक्री, मटका धंदा, हुक्का पार्लर, पत्त्याचे क्लब, अमली पदार्थांची विक्री, मसाज पार्लर या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत मी पोलिस आयुक्तांना यापूर्वी पत्रही दिलं आहे आणि विधानसभेतही यासंदर्भात आवाज उठवला आहे. 

तसंच कल्याणीनगरमधील रहिवाशांसोबत पोलिस आयुक्त साहेबांची प्रत्यक्ष भेट घेऊनही त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला आहे. शिवाय यापुढेही या अवैध व्यवसायांना माझा नेहमीच विरोध असेल. परंतु एखाद्या अपघाताशी कोणताही संबंध नसताना नाव जोडणं हे चुकीचं आणि बदनामीकारक आहे. सूज्ञ नागरीक या अपप्रचाराला बळी पडणार नाहीत, असा विश्वास आहे.

दरम्यान या प्रकरणात आता आरोपी अल्पवयीन मुलगा जामीनावर आहे. आता राजकीय वातावरण तापल्यानंतर या घटनेत अल्पवयीन आरोपीला काय शिक्षा होते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT