Chandrakant Patil : "देवेंद्रजींना कोणत्याही क्षणी अटक होणार होती", पाटलांचा गौप्यस्फोट

भागवत हिरेकर

Chandrakant Patil Statement : भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानाबद्दल देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीस यांना अटक होणार होती, चंद्रकांत पाटील यांचा दावा.
चंद्रकांत पाटील देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल काय बोलले?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

चंद्रकांत पाटील यांचे फडणवीसांबद्दल विधान

point

माढ्याची लढाई जास्त कठीण केली गेली, असंही पाटील म्हणाले.

point

पाटलांच्या विधानावर फडणवीस काय बोलले?

Chandrakant Patil on Devendra Fadnavis : भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या एका गौप्यस्फोटाने खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना देवेंद्र फडणवीस यांना अटक केली जाणार होती, असा दावा पाटील यांनी केला आहे. त्याला देवेंद्र फडणवीस यांनीही दुजोरा दिला आहे.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार तापलेला असतानाच चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानाची चांगलीच चर्चा सुरू आहे. चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना महाविकास आघाडीच्या काळात त्रास सहन करावा लागला असे कार्यकर्त्यांना सांगितलं. 

देवेंद्र फडणवीसांबद्दल चंद्रकांत पाटील काय बोलले?

"मी राज्याचा अध्यक्ष होतो. ३३ महिने काय सहन केलं आम्हालाच माहिती आहे. कुठल्याही क्षणी देवेंद्रजींना अटक होणार होती. मला खात्री होती... मला खात्री होती की ये भी दिन जायेंगे... ते गेले दिवस. जानेवारीमध्ये एकनाथजी मुख्यमंत्री झाले. त्यामुळे या कामाची चिंता परमेश्वराला आहे.

हेही वाचा >> महायुतीचा 'त्या' जागांवरील पेच सुटला? कोणती जागा कुणाला? 

फडणवीस म्हणाले, "त्यांना काहीही सापडलं नाही"

चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "नाही, हे तर मी सांगितलंच आहे. कशा प्रकारचं कटकारस्थान त्यावेळस होत होतं. त्यांना सापडतच काही नव्हतं. प्रयत्न खूप केलेत. खोट्या केसेस तयार करण्याचे प्रयत्न केला. अनेक गोष्टी केल्या. त्यासंदर्भात अजून कधीतरी सविस्तर बोलेन." 

हे वाचलं का?

    follow whatsapp