Lok Sabha 2024 : शिंदे-पवारांमुळेच भाजपवर राज ठाकरेंना सोबत घेण्याची वेळ आली?

भागवत हिरेकर

MNS BJP Alliance : महाराष्ट्रातील राजकारणात नवे समीकरणे, लोकसभा निवडणुकीत कसा होणार परिणाम?

ADVERTISEMENT

राज ठाकरे यांनी अमित शाह यांच्यासोबत चर्चा केली.
राज ठाकरे यांची मनसे भाजप, सेना, राष्ट्रवादीच्या महायुतीमध्ये सामील होणार आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महायुतीमधील समीकरणे मनसेच्या एन्ट्रीने बदलणार!

point

महायुतीत नवा पेच

point

भाजपला चौथा पक्षाची गरज

Maharashtra Politics Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे क्षणाक्षणाला बदलताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मनसे महायुतीत जाण्याबद्दल शक्यता व्यक्त केल्या जात होत्या. त्यावर आता शिक्कामोर्तब करण्याच्या हालचाली सुरू असून, एका रात्रीत महायुतीतील राजकारण बदलले आहे. पण, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष सोबत घेऊनही भाजपला राज ठाकरेंची गरज का निर्माण झाली आहे, हे जाणून घेऊयात.

महाविकास आघाडीतील दोन प्रमुख पक्ष असलेली शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस भाजपने फोडली. त्यामुळे महाराष्ट्रात महायुती आकाराला आली. दोन पक्षांना भगदाड पाडून महाविकास आघाडी महायुतीसमोर आव्हान उभे करताना दिसत आहे. त्यामुळेच भाजपकडून बेरजेचे राजकारण सुरू आहे. 

देशात 400 पार, महाराष्ट्रात मिशन 45 

भाजपने लोकसभा निवडणुकीत ४०० पेक्षा जास्त जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या जिंकून आणायच्या असे उद्दिष्ट ठेवले आहे. तर महाराष्ट्रात 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य आहे. उत्तर भारतात भाजपची कामगिरी चांगली राहणार असल्याचे ओपिनियन पोलचे अंदाज आहेत. पण, दक्षिण भारतात भाजपची निराशा होईल असे अंदाज आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशनंतर लोकसभेच्या सर्वाधिक जागा असलेल्या महाराष्ट्रावर भाजपची नजर आहे. 

गेल्या काही महिन्यात लोकसभा निवडणुकीचे ओपिनियन पोल आले, ज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊनही भाजपची महाराष्ट्रातील कामगिरी चांगली होताना दिसत आहे. शिंदे-पवारांना सोबत घेण्याचा फारसा फायदा महायुतीला होताना दिसत नाहीये.

हे वाचलं का?

    follow whatsapp