Maharashtra Lok Sabha : ठाकरेंचा सांगलीत 'गेम'; काँग्रेसचा मेसेज, विशाल पाटलांना ताकद?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

सांगली लोकसभा मतदारसंघातील बंडखोर उमेदवार विशाल पाटलांवर काँग्रेसने अजूनही कारवाई केलेली नाही.
विश्वजित कदम, विशाल पाटील आणि उद्धव ठाकरे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सांगली लोकसभा मतदारसंघ निवडणूक २०२४

point

विशाल पाटील विरुद्ध संजयकाका पाटील

point

उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना दिली आहे उमेदवारी

Sangli Lok Sabha Election 2024 : राज्यात महायुतीविरोधात एकास एक उमेदवार द्यायचा, असं ठरवत महाविकास आघाडीनं जागावाटप निश्चित केलं. पण, एका मतदारसंघात हे सपशेल अपयशी ठरलंय. तो मतदारसंघ अर्थातच सांगली लोकसभा. ठाकरेंनी सांगलीची जागा बळकावली, पण ती राखणे अवघडच असल्याचेच दिसत आहे. कारण काँग्रेसने आतून विशाल पाटलांनाच साथ दिल्याची चर्चा आहे. मतदान झाले तरी विशाल पाटलांवर काँग्रेसकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे काँग्रेसने कार्यकर्त्यांना मेसेज दिल्याचेही म्हटले जात आहे. नेमकं आता ठाकरेंचा सांगलीत गेम कसा झाला, हेच समजून घ्या. (there is buzzing that, Uddhav Thackeray's Shiv Sena did not get full support from Congress in Sangli Lok Sabha constituency)

काँग्रेसची मते विशाल पाटलांच्या बाजूने पडली?

विशाल पाटील विरुद्ध चंद्रहार पाटील अशीच चर्चा या मतदारसंघात होत राहिली. पण, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांगलीत संघटन नसताना ठाकरेंनी हा मतदारसंघ ज्या पद्धतीने काँग्रेसकडून काढून घेतला, त्याची नाराजी आता भोवणार असं दिसत आहे. याच कारण म्हणजे काँग्रेसच्या मतदाराची नाराजी. दुसरी गोष्ट म्हणजे विशाल पाटलांवर कारवाई करण्याचे काँग्रेसने टाळले आहे. 

"महाविकास आघाडी एकजूट आहे आणि सांगलीची जागा आम्ही शिवसेनेला दिली आहे. विशाल पाटील यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. सांगलीत आमचं समर्थन शिवसेनेच्या उमेदवाराला आहे. कोल्हापूरचा उमेदवार इतका महत्वाचा नव्हता", असे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला म्हणाले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> "तुला खासदार करण्याची जबाबदारी विश्वजित कदमांची राहिल", कदमांचं तुफान भाषण 

चेन्निथला यांच्या विधानाचा अर्थ काढायचा झाला, तर विशाल पाटील काँग्रेससाठी किती महत्त्वाचे आहेत, हे समजून येतं. विशाल पाटलांनी बंड केलं, ते मूळात ठाकरेंनी जागा हिरावून घेतल्यामुळे. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची आहे. अशात त्यांच्यावर कारवाई केली, तर पक्षातील नव नेतृत्वापर्यंत वाईट मेसेज जाईल, अशीही भीती काँग्रेसला होती, असे विश्लेषक सांगतात. 

दुसरं महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसने विशाल पाटलांवर कारवाई करण्याला बगल देत काँग्रेसने पक्षातील नवनेतृत्वाला पक्ष तुमच्यासोबत असल्याचा मेसेज दिला, असा अर्थही राजकीय जाणकार लावत आहेत. 

ADVERTISEMENT

काँग्रेसचे बंड म्हणत विशाल पाटलांनी काय साधलं?

"हे माझं व्यक्तिगत नव्हे, तर काँग्रेसचं बंड असल्याचे म्हटले आहे. महाविकास आघाडीत जागावाटपाचा घोळ झाला, जो अन्याय काँग्रेसवर झाला, त्याविरोधात हा जनतेचा आवाज आहे. ही जनतेची उमेदवारी आहे, असे विशाल पाटील हे सातत्याने सांगत आले आहेत.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> डोंबिवली हादरली! बॉयलरच्या स्फोटात चौघांचा मृत्यू, 25 ते 30 कामगार गंभीर जखमी 

काँग्रेसचं बंड आहे, असं दाखवण्यात विशाल पाटील हे यशस्वी झाले आहेत. महाविकास आघाडीत जागावाटप ठरवताना शिवसेनेने सांगलीच्या जागेबद्दल विश्वासार्हता राखली नाही. शिवसेनेनं काँग्रेसकडून जागा काढून घेतली. 

सांगलीचा घोळ हा विचित्रपणे झाला आहे. शिवसेनेने परस्पर जागेवर दावा केला आणि परस्परच उमेदवार जाहीर केला. याच गोष्टीमुळे काँग्रेस दुखावली गेली आहे. 

महाविकास आघाडीत संभ्रम

शरद पवारही सांगलीबद्दल बोलताना म्हणाले की, सांगलीची जागा शिवसेनेला सोडली हे मला टीव्हीवरून कळालं. शिवसेनेने उमेदवारी परस्पर जाहीर केली, हे मला टीव्हीवरून कळालं. 

विशाल पाटील यांच्या निलंबनाचा निर्णय घेणं हे काँग्रेससाठी अवघड होऊन बसलेलं आहे. विशाल पाटील यांच्याबद्दलचा अहवाल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रीय काँग्रेसकडे म्हणजेच दिल्लीतील नेतृत्वाकडे पाठवला आहे. त्याच्यावर आतापर्यंत निर्णय होणं अपेक्षित होतं पण तो अद्याप झालेला नाही.

हेही वाचा >> यमाची पडली वक्रदृष्टी; महाराष्ट्रात 20 जणांचा बुडून मृत्यू! 

कोल्हापूरमध्ये बाजीराव खाडे यांनी बंड केले. ते राष्ट्रीय सचिव आहेत, प्रियांका गांधी यांचे निकटवर्तीय आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, पण विशाल पाटील यांच्याबद्दल काँग्रेस सहानुभूतीने विचार करताना दिसते आहे. 

विशाल पाटील, वसंतदादा पाटील यांच्या घराण्यावर आणि सांगलीतील काँग्रेसवर अन्याय झालाय. हे काँग्रेसलाही पटलेलं आहे. त्यामुळे विशाल पाटलांवर कारवाई करण्यात विलंब होतोय, किंवा कारवाई टाळलं जातंय असंच दिसत आहे.

हेही वाचा >> शिंदेंचाच नेता म्हणतोय, ठाकरेंचा 'हा' उमेदवार "डायरेक्ट खासदार होणार"! 

शिवसेनेने सांगली लोकसभा मतदारसंघ राखून घेताना विश्वासार्हता जपली नाही. ती जपली असती, तर शिवसेनेला कारवाई करा म्हणण्याचा अधिकार राहिला असता. महाविकास आघाडीच्या वाटाघाटीमध्ये आमच्या वाट्याला सांगली आलेली आहे आणि असे असताना काँग्रेसचा प्रदेश उपाध्यक्ष इथं बंडखोरी करतोय आणि त्याच्यावर तुम्ही कारवाई केलीच पाहिजे असं ते रेटून सांगू शकले असते. 

संजय राऊत यांनी प्रयत्न केला. पण, काँग्रेसकडून तो फारसा गांभीर्याने घेतल्याचे दिसले नाही. कारण सांगलीबद्दल काँग्रेसला बाजूला ढकलण्याची भूमिका राऊतांनी घेतली होती. ती काँग्रेसच्या नेत्यांना आवडलेली दिसली नाही. नाना पटोले आणि विश्वजित कदम यांच्यासोबत शा‍ब्दिक चकमक झाली. राऊतांनी टोकाची भाषा काँग्रेस नेत्याबद्दल वापरली. महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरोधात कुणी बंड केले, तर कारवाई केली पाहिजे... या भूमिकेला सांगली अपवाद राहिली. 

सांगलीत काँग्रेस कार्यकर्ते विशाल पाटलांच्या मागे?

या मतदारसंघातील परिस्थिती बघितली तर चंद्रहार पाटील यांच्यावर थेट परिणाम झालेला आहे. काँग्रेसकडून शेवटपर्यंत चंद्रहार पाटील यांनी माघार घेण्यासाठी प्रयत्न झाले. काँग्रेस सातत्याने सांगत राहिली की मतदारसंघातील परिस्थिती चांगली नाही. चंद्रहार पाटलांची उमेदवारी शिवसेनेकडून रेटली गेली. पण, या सगळ्यात काँग्रेसचे कार्यकर्ते विशाल पाटील यांच्यासोबतच काम करताना दिसत आहे. कार्यकर्ते उघडपणे काम करत आहेत, अशी माहिती स्थानिक पत्रकारही सांगत आहे.

हेही वाचा >> "निवडणुकीनंतर तुम्हीच मुख्यमंत्री", भुजबळांना कुणी दिलेली ऑफर? 

पलूस कडेगाव हे दोन तालुके विश्वजित कदम यांचा बालेकिल्ला आहे. जतमध्ये विश्वजित कदम यांचे मावसभाऊ आमदार विक्रम सावंत यांचा प्रभाव आहे. सांगली आणि मिरजमध्ये विशाल पाटील यांच्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचे मुंबई Tak ने केलेल्या ग्राऊंड रिपोर्टमध्ये दिसून आले. तासगाव आणि कवठे महाकाळमध्येही दुसरी फळी विशाल पाटील यांच्या बाजूने झुकल्याचे दिसत आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघात ज्या पद्धतीने प्रचार झाला आणि काँग्रेसने विशाल पाटलांवर कारवाई करण्याचे टाळले. हा ठाकरेंना मेसेज असल्याचे म्हटले आहे. अशातच सांगलीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात विशाल पाटीलही हजर होते. विशाल पाटलांच्या हजेरीने आता सांगलीत ठाकरेंचा 'गेम' झाला असे म्हटले जात आहे. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT