Lok Sabha election 2024 : "भाजप 370 जागा जिंकणं अवघड, 4 राज्यात बसू शकतो झटका"

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

लोकसभा निवडणुकीत कुणाला किती जागा मिळणार, राजकीय विश्लेषक काय म्हणताहेत?
भाजप प्रणित एनडीए आघाडी आणि काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीला किती जागा मिळणार?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लोकसभा निवडणूक निकाल २०२४ अंदाज

point

भाजपला किती जागा जिंकणार, एनडीएला किती जागा मिळणार?

point

काँग्रेसला किती जागा मिळणार, इंडिया आघाडी किती जागा जिंकेेल?

Lok Sabha election 2024 : देशात होत असलेल्या लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत. त्यामुळे देशात सत्तांतर होणार की, भाजप सत्ता राखणार? भाजप प्रणित एनडीए आघाडी खरंच ४०० जागा जिंकू शकते का? या प्रश्नांभोवती चर्चा होताना दिसत आहे. यासंदर्भात राजकीय विश्लेषकांनी काही अंदाज व्यक्त केले आहेत. ते काय हेच समजून घ्या... (How many seats will bjp get in lok sabha election 2024)

अॅक्सिस माय इंडियाचे संस्थापक प्रदीप गुप्ता आणि लोकनीति सीएसडीएसचे सह संचालक संजय कुमार यांनी 'इंडिया टुडे'च्या कार्यक्रमात काही अंदाज व्यक्त केले आहेत. त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल काही मुद्दे मांडले आहेत. 

भाजप किती जागा जिंकणार?

लोकनीति सीएसडीएसचे सह संचालक संजय कुमार यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल बोलताना सांगितले की, "माझ्या अंदाजानुसार भाजप आपल्या मित्रपक्षांसोबत जवळपास ३०० जागा जिंकेल. मला नाही वाटत की, एनडीए ३७० आणि ४०० जिंकेल."

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> शिंदेंचाच नेता म्हणतोय, ठाकरेंचा 'हा' उमेदवार "डायरेक्ट खासदार होणार"!

"भाजप २७२ पेक्षा अधिक जागा जिंकेल, पण त्या खूप कमी फरकाने असेल. २०१९ त्या तुलनेत ही निवडणूक भाजपसाठी कठीण ठरली आहे. काँग्रेस २०१९ च्या तुलनेत चांगली कामगिरी करेल. काँग्रेस जास्त जागा जिंकू शकते", असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. 

निवडणुकीत कोणते मुद्दे ?

एनडीए आणि इंडिया आघाडीला किती जागा मिळू शकतात, याबद्दल बोलताना प्रदीप गुप्ता म्हणाले की, "बेरोजगारी, महागाई असे मुद्दे मागील ५० वर्षांपासून निवडणुकीत प्रमुख राहिलेले आहेत. पुढील ५० वर्षातही केंद्रस्थानी राहतील. प्रश्न हा आहे की, यावर चर्चा करायला कोण तयार आहे आणि मतदार यावरच सरकार निवडत असते."

ADVERTISEMENT

'अबकी बार ४०० पार', संजय कुमार काय म्हणाले?

निवडणूक विश्लेषक संजय कुमार यांनी न्यूज २४ वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, "एनडीएला ४०० जागा आणि भाजपला ३७० जागा ही चर्चा संपली आहे. भाजपला २०१९ मधील कामगिरीची पुनरावृत्ती करता येईल का? म्हणजेच भाजपला ३०३ जागा जिंकता येतील का, यावर चर्चा सुरू झाली आहे."

ADVERTISEMENT

हेही वाचा >> ठाकरेंचा सांगलीत 'गेम'; काँग्रेसचा मेसेज, विशाल पाटलांना ताकद?

"माझ्या मते, आता ही चर्चा होत आहे की, भाजप स्वबळावर २७२ जागा जिंकू शकेल का? आता असा अंदाज आहे की, भाजप बहुमत मिळवण्यात यशस्वी झाली तरी त्यांना काठावरच बहुमत मिळेल. भाजपच्या हातातून ५ ते ७ जागा निसटू शकतात", असे भाष्य कुमार यांनी केले. 

'या' चार राज्यात भाजपला बसू शकतो फटका -संजय कुमार

संजय कुमार यांनी असा अंदाज व्यक्त केला आहे की, "कर्नाटकमध्ये भाजपला पूर्वीच्या कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही. त्यामुळे २५ जागा मिळवू शकणार नाही. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आहे आणि तिथे सिद्धरामय्या मुख्यमंत्री, तर डी.के. शिवकुमार उपमुख्यमंत्री आहेत. दोघे काँग्रेसचा प्रचार करत आहेत, ज्यामुळे भाजपला नुकसान होईल. 2019 मध्ये युतीला ४१ जागा मिळाल्या होत्या. यावेळी तितक्या जिंकणे अवघड आहे."

हेही वाचा >> "फडणवीसांनी फोन केला अन्...', ठाकरेंचं सरकार पडण्यापूर्वीचा किस्सा

"हिमाचल प्रदेशातील ४ जागा पुन्हा भाजप जिंकू शकते किंवा हारू शकते. हरयाणामधील परिस्थिती बदलली आहे. भाजपला जागा गमवाव्या लागू शकतात. १० पैकी ५-६ जागाच भाजपा जिंकू शकते. दिल्लीतील असं होऊ शकते की भाजप ६ जागा जिंकेल. कारण लीड ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. मात्र, ४ ते ५ टक्के मते काँग्रेस, आपच्या बाजूने फिरली तर भाजपला ३-४ जागा गमवाव्या लागू शकतात", असा अंदाज कुमार यांनी व्यक्त केला. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT